कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पवन हंस हेलिकॉप्टर दोन पायलट आणि इतर सात जणांना घेऊन मुंबई किनारपट्टीपासून सुमारे ५० मैल अंतरावर समुद्रात पडले. संलग्न फ्लोटर्सच्या मदतीने हेलिकॉप्टर काही काळ वाचले. त्यामुळे सर्व नऊ जणांना वाचवण्यात बचावकर्त्यांना यश आले. मात्र, ते म्हणाले की त्यापैकी चार बेशुद्ध पडले होते. आणि त्यांना मुंबईतील एका नौदलाच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. तेथे त्यातील चार जणांना मृत घोषित करण्यात आले.
रिगवरील लँडिंग झोनपासून सुमारे १.५ किमी अंतरावर हेलिकॉप्टर समुद्रात पडले होते, असं अधिकाऱ्याने सांगितले. या अपघाताची कारणे शोधली जात आहेत. अपघाताशी संबंधित इतर गोष्टींचाही तपास करण्यात येत आहे. ओएनजीसीकडे अरबी समुद्रात अनेक रिग आहेत ज्यांचा वापर समुद्र सपाटीच्या खाली असलेल्या जलाशयातून तेल आणि वायू निर्मितीसाठी केला जातो. हेलिकॉप्टरमधील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी ओएनजीसीने तात्काळ जवळच्या सेंटरमधील जहाजे तैनात केली गेली, असं या अधिकाऱ्याने सांगितलं. ‘सागर किरण’ हेलिकॉप्टर नावाच्या बचाव नौकेने आपत्कालीन लँडिंग स्थळी पोहोचून एका व्यक्तीला वाचवले, तर ओएनजीसीच्या मालवीय-16 जहाजाने चार जणांना वाचवले, असं संबंधित अधिकाऱ्याने सांगितलं.