मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत राज्यपालांसह भाजपवर निशाणा साधला आहे. ‘राज्यपालांकडे आम्ही १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव दिला होता. मात्र तो मागील अडीच वर्षांपासून प्रलंबित आहे. आता बहुमत चाचणीबाबत मात्र ते चांगलीच तत्परता दाखवत आहेत. राफेलपेक्षा राज्यपालांचा वेग जास्त आहे,’ असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.

बहुमत चाचणीच्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. ‘१६ आमदारांना अपात्र करण्यासंदर्भातील विषय सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना बहुमत चाचणी घेणे बेकायदेशीर आहे. याविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहोत,’ अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

Maharashtra Floor Test: उद्याच बहुमत सिद्ध करा, राज्यपाल कोश्यारींचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

दरम्यान, शिवसेनेचे आमदार फोडून भाजप राज्यातील सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, असं उपरोधिक भाष्यही राऊत यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here