मुंबई : देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे एक असं नाव आहे ज्याने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला हादरवून सोडलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आणि फडणवीसांच्या खेळीमुळे उद्धव ठाकरेंकडून सत्तेसोबत पक्षही हातातून जाताना दिसत आहे. सत्तेच्या याच खेळात एक शायरी लक्षात येते. ती अशी की, ‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना…मैं समंदर हूं लौटकर वापस आऊंगा’

०१ जून २०२२ ला पुण्यातील पहिल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटनावेळी फडणवीसांनी सत्तेचा इशारा दिला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या चुकीच्या खेळीने सत्तेचा खेळ गमावला. त्यामुळे हा खेळ नीट खेळा असं त्यांनी भाषणात सांगितलं होतं. त्यामुळे यावेळी सत्तेसाठी बुद्धिबळात त्यांनी कोणतीही चूक केली नाही असंच दिसतंय.

शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांचं चांगलं होणार नाही, फायर आजींचा तळतळाट; पाहा काय म्हणाल्या…
पडद्यामागून केलं मिशन पूर्ण…

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा खेळ बिघडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्क्रिप्ट लिहल्याची राजकीय चर्चा आहे. पण पूर्वीसारखी चूक होऊ नये म्हणून ते योग्य वेळेची वाट पाहत होते. त्यामुळेच यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत पडद्याआडच चर्चा केली. अगदी शेवटपर्यंत त्यांनी चाणक्याप्रमाणे योजना आखली, ज्याची शेवटपर्यंत कोणालाही खबर लागली नाही. या नियोजनातून हिंदुत्वाची विचारधारा समोर आली. ते जवळपास वर्षभरापासून शिवसेनेचे ज्येष्ठ आणि तगडे नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते, अशीही चर्चा आहे. पण त्याची कुणाला कुणकुणही लागली नाही.

हनुमान चालीसेच्या मुद्द्यांनतर खेळाला सुरुवात…

एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाचे मोठे पुरस्कर्ते मानले जातात. ठाणे आणि आजूबाजूचा परिसर हा त्यांचा बालेकिल्ला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली उद्धव ज्या प्रकारे काम करत होते अशात हनुमान चालीसा प्रकरणाने आगीत आणखीनच भर टाकली. त्यामुळे शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार खूश नव्हते. याचाच फायदा फडणवीसांना झाला.

Mumbai Crime: प्रेमप्रकरणातून ३ महिलांची हत्या एकाची आत्महत्या, रुग्णालयात मृतदेह आढळल्याने खळबळ
खरंतर, याआधी आदित्य ठाकरेंकडूनही एकनाथ शिंदे यांचा अपमान करण्यात आला होता. त्यामुळे शिवसेनेत अंतर्गत वाद रंगला. या सगळ्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदेंनी बंड केलं. त्यांच्या या बंडाला शिवसेनेतील सगळ्या मंत्र्यांनी पाठिंबा दिला आणि गुवाहाटी गाठलं. त्यामुळे एकट्या पडलेल्या उद्धव ठाकरेंना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

शिंदेच्या मनात नेमकं काय?

दरम्यान, या सगळ्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बंड करणाऱ्या आमदारांनी एकदाही शिवसेना सोडल्याचं वक्यव्य केलं नाही. हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर ठाम असल्याचं सांगत आम्ही शिवसेनेतच आहोत असंही वारंवार आमदारांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे शिंदेच्या मनात नेमका काय प्लॅन होता, हे कळलंच नाही.

फडणवीस पुन्हा येणार?

अखेर आता या सत्ता नाट्याचा पडदा पडला आहे. शिंदेंच्या बंडामुळे अखेर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि आता शिंदे हे फडणवीसांसोबत बहुमत सिद्ध करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आता शिंदे आपल्या आमदारांसह मुंबईत आल्यानंतर हा नेमका काय प्लॅन होता, हे उघड होईल. पण या सगळ्यात फडणवीस पुन्हा येणार, अशीच चिन्हं आहेत.

एसटीमध्ये सापडली बेवारस पिशवी; पोलिसांनी उघडताच हादरले, आषाढी वारीमुळे चिंता वाढली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here