मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की… या शब्दांनी सुरुवात करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथवेळी शिंदे समर्थकांनी आनंदाच्या भरात जोरदार घोषणाबाजी केली. पण अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई-वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे…” या शब्दांनी सुरुवात केल्यानंतर राज्यपाल महोदय नाराज झाले होते. इतरही मंत्र्यांनी शपथ घेताना वेगळी सुरुवात केल्याने राज्यपाल चिडले होते. मात्र यावेळी राजभवनात शिंदे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर आणि शिंदेंनी शपथ घेताना वेगळी सुरुवात केल्यानंतरही राज्यपाल चिडले नाहीत, ओरडले नाहीत, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

जवळपास दहा दिवसांच्या सत्तासंघर्षाची अखेर अवघ्या चार तासांतील नाट्यमय घडामोडींनी झाली. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी जोरदार चर्चा असताना फडणवीसांनी धक्कातंत्र वापरत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली. त्यानंतर राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दोन तासांआधी सरकारमध्ये सामिल होणार नाही, अशी भूमिका मांडणाऱ्या आणि हायकमांडचा आदेश आल्यानंतर शपथ घ्यायला तयार झालेल्या फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.

बाळासाहेब आणि आनंद दिघेंचं स्मरण, एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना स्मरून घेतली. मात्र यावेळी राज्यपाल महोदय चिडले नाहीत, ओरडले नाहीत, रागावले नाहीत, त्याचं काय कारण असावं, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. त्याचं कारण मागील ठाकरे सरकारमधील दोन-तीन मंत्र्यांनी शपथ घेतावेळी अशीच स्मरुन शपथ घेतली होती. त्यावेळी मात्र राज्यपालांनी भर मंचावरुन नाराजी व्यक्त केली होती. आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या के सी पाडवी यांना तर सुनावलं होतं.

एकनाथ शिंदे यांची वेगळ्या प्रकारे शपथेला सुरुवात

एरवी कोणतेही मंत्री शपथ घेताना राज्यपालांनी ‘मी’ म्हणून निर्देश दिल्यानंतर त्यापुढे त्यांचं नाव घेऊन शपथ घेत असतात. पण एकनाथ शिंदे यांनी यांनी असं न करता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की… या शब्दांनी सुरुवात करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ पूर्ण घेतली.

‘ते’ पुन्हा आले पण उपमुख्यमंत्री म्हणून, राज्यपालांकडून फडणवीसांना शपथ!

फडणवीसांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या शपथेवर आक्षेप घेतला होता!

देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी विधानसभेत ३० नोव्हेंबर २०१९ रोजी भाषण करताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शपथेवर आक्षेप घेतला होता. आपल्या संविधानात कशा प्रकारे शपथ घ्यावी याचा नमुना दिला आहे. ज्या क्षणी राज्यपाल मी म्हणतात, त्यानंतर आपलं नाव संबंधित मंत्र्यांनी घ्यायचं असतं आणि शपथेला सुरवात करायची असते, असं सांगत उद्धव ठाकरे यांचा शपथविधी असंविधानिक असल्याचा आक्षेप देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना घेतला होता.

आधी उद्धव ठाकरेंना टोला, तोच नशिबाचा धागा पकडत राज ठाकरेंच्या एकनाथ शिंदेंना शुभेच्छा
त्यानंतर हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहाबाहेरील मुद्दा उपस्थित करता येणार नाही असं म्हटलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस या सभागृहात संविधानावर बोलायचा अधिकार आहे की नाही? असा सवाल केला होता. या सभागृहात संविधानावर बोलायचा अधिकार नसेल तर मी सभागृहात बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला होता.

माननीय राज्यपालांनी मी म्हटल्यानंतर विहीत नमुन्यात शपथ घेतली तरच ती शपथ ग्राह्य मानली जाते, अन्यथा ती शपथ ग्राह्य धरली जात नाही. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी शपथ चुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी शपथ घेतली होती. मी याकरीता पॉईंट ऑफ प्रोसिजरवर घेत होतो कारण मुख्यमंत्र्यांसह सगळ्या मंत्र्यांनी घेतलेली शपथ संविधानाप्रमाणं नव्हती, असा आक्षेप त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here