हेही वाचा – एसटीमध्ये सापडली बेवारस पिशवी; पोलिसांनी उघडताच हादरले, आषाढी वारीमुळे चिंता वाढली
राज्यात करोनामुळे चार जणांचा मृत्यू…
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात करोनाच्या संसर्गामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात ३,२४९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एका दिवसात आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण अभ्यास केला तर ०१ जुलैपर्यंत २३,९९६ इतकी सक्रीय करोनाची प्रकरण होती. पण पावसामुळेही अनेक साथीच्या रोगांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं, महत्त्वाचं आहे.
हेही पाहा – तब्ब्ल ६० वर्षानंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील अजब प्रकार, PHOTOS पाहून थक्क व्हाल
देशात वाढत आहेत करोनाची प्रकरणं…
गेल्या काही दिवसांपासून देशात करोना संसर्गाचा वेग पुन्हा एकदा वाढला आहे. गेल्या २४ तासांत करोनाचे १७ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत देशात कोव्हिडचे १७,०९२ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, १४,६८४ रुग्ण बरे झाले आहेत.
अहवालानुसार, सक्रिय प्रकरणे १,०९,५६८ आहेत. काल म्हणजेच १ जुलै रोजी १७,०७० नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. आजचा आकडा कालच्या तुलनेत ०.१ टक्के जास्त आहे. अहवालानुसार, देशातील पाच राज्यांमध्ये सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत.