‘आदित्य ठाकरे मंत्री असतानाही का फिरले नाहीत’
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदी असताना त्यांनी आम्हाला वेळ दिला नाही, असा दावा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडून केला जात होता. आजच्या भाषणात गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला. ‘आदित्य ठाकरे हेदेखील मंत्री असताना महाराष्ट्रात फिरले नाहीत. एकटे एकनाथ शिंदे महाराष्ट्रात फिरले, जळगावात ते पाच वेळा आले. शरद पवार आज या वयातही राज्यात फिरतात, अजित दादा फिरतात. पण आमचे नेते का नाही आले?’ असा सवाल गुलाबराव पाटलांनी केला.
बंडखोर गुलाबराव पाटील स्वकियांविरोधातच कडाडले
‘अजित पवार यांचं टार्गेट १०० आमदार निवडून आणण्याचं आहे, बच्चू कडू यांचं १० आमदारांचं आहे. पण आमचं काय? सगळे पक्ष वाढवत आहेत. आमचं घर जळतंय. एक काळ होता, भुजबळ गेले तेव्हा केवढा उठाव झाला. राणे गेले तेव्हा उठाव झाला. पण आज काय झालं? थोडंसं झालं. मतदारसंघात जाऊ तेव्हा पाहा आमची यात्रा. शिवसैनिकांना मान्य असलेला निर्णय घेतला. पाच आमदार गेले ठिक आहे, पण ४० आमदार गेले. पाच टर्मला निवडून आलेले आमदार, मंत्रिपद सोडून आमदार फुटतात. तुम्ही आम्हाला म्हणायला हवं होतं या पाखरांना, चिमण्यांनो. चार लोकांनी आमच्या उद्धव साहेबांवर ही वेळ आणली,’ अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली.