वाचाः रत्नागिरीत पावसाचे रौद्ररुप! जगबुडीने ओलांडली धोका पातळी, राजापूरमध्ये अर्जुना धरणाचा कालवा फुटला
या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. मात्र या घटनेमुळे चिरेखाण कामगारांच्या सुरक्षित वास्तव्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खेड तालुक्यामध्येही गेल्यावर्षी दरड कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती त्यामुळे येथील प्रांताधिकारी राजश्री मोरे,तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, पोलीस निरीक्षक निशा जाधव या सगळ्या प्रशासकीय महिला अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान यापूर्वीच खेड तालुक्यातील एकूण १५५ जणांना यापूर्वीच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. दापोली, पालगड, जामगे विभागातील इक्बाल नगर येथील २९ नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. अलीकडे कोकणात पावसाळ्यात दरडींचा धोका वाढत चालला असून यामध्ये नवीन ठिकाणांची भर पडताना दिसत आहे. या बदलत्या निसर्गाच्या चक्रात व बदलत्या जीवनामध्ये व विकासाच्या व्याख्येत नव्याने उभी राहणारी बांधकाम, घरे आदींमुळे जणू निसर्गदेवताच कोपली आहे की काय असा प्रश्न पडतो.
वाचाः पावसाचे थैमान!; मुंबई, ठाण्याला ऑरेंज, तर रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरला रेड अलर्ट

घरावर दरड कोसळली
दापोली तालुक्यातील दाभोळ ढोरसई, टेमकर वाडी, आसूद काजरेवाडी, हर्णै राजवाडी येथे या दरडी कोसळून दुर्घटना घडल्या आहेत. या सगळ्या परिसराची पाहणी दापोली प्रांत अधिकारी शरद पवार, तहसीलदार वैशाली पाटील, मंडळ अधिकारी सुदर्शन खानविलकर, श्री. गुरव, आदी कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. राजवाडीमधील तीन कुटुंब चौदा माणसे, फतेगड एकोणिस नागरिकांना तर दाभोळ ढोरसई परिसरात साईबाबांच्या मंदिराजवळ असलेल्या पाच घरातील एकोणतीस माणसांना स्थलांतरित करण्यात आले आहे. दरम्यान या सगळ्या संबंधित कुटूंबांना तेथील दरडींचा धोका लक्षात घेऊन महसुल प्रशासनाकडुन यापूर्वीच स्थलांतरित होण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या.
वाचाः मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाची व्यथा; १२ हजार नागरिकांचा जीव टांगणीला
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times