सिंधुदुर्ग : राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबई, पुण्यासह कोकणातही मुसळधार सुरू आहे. अशात हवामान खात्याकडून पुन्हा एकदा अलर्ट जारी करण्यात आला आहे. कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला सलग दुसऱ्या दिवशी पूर आल्याने पाणी पुलावरून वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे जवळजवळ २७ गावाचा संपर्क तुटल्याची माहिती आहे.
कुडाळ तालुक्यातील माणगाव बाजारपेठेत घुसले पाणी…
कुडाळ जिल्ह्यातील लघू पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के भरले असून सकाळीपासून जिल्ह्यात पावसाची विश्रांती आहे. त्यामुळे पूरस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे. पण असं असलं तरी पुढील काही दिवस कोकणासाठी महत्त्वाचे आहेत.