अमरावती : राज्याच्या सत्ताकारणात शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर थेट सत्तांतरण झाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. या सत्ता नाट्ट्यासाठी सुरत, गुहाटी, गोवा, मुंबई मार्गे मतदारसंघात पोहोचलेल्या सर्व बंडखोर आमदारांना नवीन आलेल्या राज्य सरकारने Y दर्जाची सुरक्षा पुरविली.

यात अमरावती जिल्ह्यातील आमदार बच्चू कडू यांना सुद्धा वाय दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली होती. त्यांनी मुंबईचे आईजी कृष्णप्रकाश यांना फोन करून मला ही सुरक्षा नको असल्याची माहिती दिली आणि तुमचे पोलीस परत बोलून घ्या अशी विनंती केली.

Pimpri News: आईसोबत दुकानात गेला तो परतलाच नाही, ६ वर्षीय मुलासोबत जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही

संपूर्ण राजकीय सत्ता नाट्यामध्ये बंडखोरी केलेले आमदार मुंबईत आल्यानंतर त्यांना मोठी सुरक्षा देण्यात आली होती. पण आमदार बच्चू कडू यांनी आज आईजींना फोन करून पोलीस प्रोटेक्शन नको असल्याचं सांगितलं आहे.

मुंबई येथून काल आमदार बच्चू कडू यांना एस्कॉर्ट सुविधा पुरविण्यात आली होती आणि मतदार संघातदेखीलही सुविधा देण्यात आली होती. आमदार बच्चू कडू पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन रात्री घरी पोहचल्यानंतर त्यांना पोलीस सुरक्षा असल्याचं समजलं. पण यानंतर त्यांनी या सुरक्षेसाठी नकार दिला आहे.

आमदार बच्चू कडू यांनी IG कृष्णप्रकाश यांना फोन करून त्यांनी मुंबई येथील ऑफीस व घर इथे मिळालेली पोलीस सुरक्षा सुविधा नको हे कळविले आहे.

Pune Weather : ऑरेंज अलर्ट असूनही पुणेकरांसाठी Good News, भुशी डॅम ओव्हरफ्लो; उच्चांकी पावसाची नोंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here