मुझफ्फरपूर: बिहारमधील एका प्राध्यापकानं त्याचं ३२ महिन्यांचं वेतन परत केलं आहे. महाविद्यालयात आपल्या विभागात विद्यार्थी नसल्यानं प्राध्यापकानं वेतन घेण्यास नकार दिला. मी कोणत्याच विद्यार्थ्याला शिकवलेलं नाही. मग मी पगार कसा काय घेऊ, असा प्रश्न विचारत प्राध्यापकानं जवळपास २४ लाख रुपयांच्या वेतनाचा चेक परत केला. या प्राध्यापकाच्या प्रामाणिकपणाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

प्राध्यापक डॉ. ललन कुमार मुझफ्फरपूरच्या नितीश्वर महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. विभागात विद्यार्थीच नसल्यानं त्यांनी ३२ महिन्यांचा पगार परत केला नाही. बिहार विद्यापीठाच्या कुलगुरुंना त्यांनी एक २४ लाखांच्या चेकसह एक पत्र पाठवलं आहे. आपल्याला एलएस, आरडीएस, एमडीडीएम आणि पीजी विभागात बदली करण्यात यावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्याचं पुन्हा कानावर येता कामा नये, मुख्यमंत्र्यांची सक्त ताकीद
मी २५ सप्टेंबर २०१९ मध्ये नितीश्वर महाविद्यालयात कार्यरत आहे, असं ललन कुमार यांनी पत्रात म्हटलं आहे. ‘मला विद्यार्थ्यांना शिकवण्याची इच्छा आहे. मी हिंदी विभागात शिकवतो. विभागात १३१ विद्यार्थी आहे. मात्र त्यातील एकही जण वर्गात बसत नाही. वर्गात विद्यार्थीच नसल्यानं इथे काम करणं माझ्यासाठी शैक्षणिक मृत्यू झाल्यासारखं आहे. इच्छा असूनही मला माझं कर्तव्य बजावता येत नाहीए. अशा परिस्थितीत वेतनाची रक्कम घेणं माझ्यासाठी अनैतिक आहे,’ असं कुमार यांनी पत्रात नमूद केलं आहे.
BJP & MNS: मनसे-भाजप जवळीकीचे संकेत, अमित ठाकरे नितेश राणेंच्या भेटीला, पाऊण तास चर्चा
याआधी मी अनेकदा आंतर महाविद्यालय बदलीसाठी अर्ज केले. मात्र कुलगुरुंनी याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. अशा परिस्थितीत मी माझ्या कामाला न्याय देऊ शकत नाही. माझ्या अंतरात्माचा आवाज ऐकून मी नियुक्तीची तारीख (२५ सप्टेंबर २०१९) ते (मे २०२२) पर्यंतचा २३ लाख ८२ हजार २२८ रुपये इतका पगार विद्यापीठाला परत करत आहे, असं कुमार यांनी पत्रात पुढे म्हटलं आहे.

कुमार यांनी कुलगुरुंसोबतच मुख्यमंत्री (राज्य सरकार) शिक्षणमंत्री, अर्थ विभाग, उच्च न्यायालय (जनहित याचिकेच्या स्वरुपात), विद्यापीठ अनुदान योगदान, शिक्षण मंत्री (केंद्र सरकार), पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आणि राष्ट्रपती यांनादेखील पत्राची प्रत पाठवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here