‘काँग्रेसमध्ये माणसं तरी किती शिल्लक आहेत?’
विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसची मतं फुटल्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षातील आमदारांवरच कारवाई करण्याच्या केलेल्या मागणीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी निशाणा साधला आहे. ‘कॉंग्रेस पक्ष आता कारवाई तरी कोणावर करणार? कारवाई करायला या पक्षात माणसं तरी किती शिल्लक राहिली आहेत? आपल्या विचारांना आणि तत्वांना तिलांजली देवून कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी झाला होता. धोरणांचा, विचारांचा आणि कार्यकर्त्यांचा विचार न करता सत्ता भोगल्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांनीच माफी मागण्याची आवश्यकता आहे,’ असं वक्तव्य विखे यांनी केले.
राज्यात शिवसेनेचीही कॉंग्रेसपेक्षा वेगळी परिस्थिती नाही. नेतृत्वावर विश्वास न राहिल्यानेच अनेकजण नेतृत्वापासून दूर चालले आहेत. ५५ आमदारांपैकी ४० आमदार एकावेळी निघून जातात. १२ खासदारही त्याच विचारात आहेत, आणखी किती माणसे दूर जातील याचा अंदाज शिवसेनेच्या नेतृत्वाला आता राहिलेला नाही. सत्तेसाठी भरकटलेले जहाज यांचे होते. त्यामुळेच बेताल वक्तव्य करणारे प्रवक्ते आता पक्षात दिसतील असा खोचक टोला विखे पाटील यांनी लगावला आहे.
शिंदे फडणवीसांच्या मध्यरात्री खरंच भेटी व्हायच्या? शंभूराज देसाई म्हणाले….