या पत्रात राज्यपालांच्या दुटप्पी भूमिकेवर मिटकरींनी सडकून टीका केली. बहूमत चाचणी, विधानसभा अध्यक्षांची निवडणुक, १२ आमदारांची यादी आदी गोष्टींमधून राज्यपालांनी आपण पक्षपाती असल्याचं दाखवून दिल्याचा खळबळजनक आरोप मिटकरींनी आपल्या पत्रातून केला आहे.
वाचा काय आहे संपूर्ण पत्र…
प्रथमचं कोरोनानंतरच्या काळात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलपती म्हणून ३६ व्या दीक्षांत समारंभास आपण स्वत: हजर राहत असल्याने कृषी विद्यापीठ सदस्य म्हणून ‘भारतीय संविधानाची’ प्रत देउन सन्मानित करतांना आनंद होतो आहे. कारण देशातील लोकशाहीची समता, स्वातंत्र्य व बंधुता ही मुल्ये याच संविधानात आहेत. असं या पत्रात नमूद आहे.
पी.सी. अलेक्झांडर हे लोकांचे राज्यपाल म्हणून महाराष्ट्राच्या जनतेस आजही स्मरणात आहेत. आपण शिवप्रेमी आहात. व संविधानप्रेमी असाल याबाबत तरी आशादायी आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपण अनेकदा घटना बाह्य वागलात असे मत विविध घटनातंज्ञांनी व्यक्त केले. मग घाईघाईत बेतलेली फ्लोअर टेस्ट, राजकारण्यांना भरवलेले पेढे, १२ आमदारांची प्रलंबीत यादी. यामुळे आपली भूमिका वारंवार संशयाच्या भोवऱ्यात येतं असली तरीही आपण संविधानाचा नेहमीच सन्मान करत असाल, याबाबत शंका नाही. आपण शिवनेरी व रायगड स्वतः चढून गेलात हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण होता.
छत्रपती शिवरायांचाच विचार ज्या भारतीय राज्यघटनेत आला. तिचे पालन व संरक्षण आपण निश्चीतच करावे या अपेक्षेपोटी आपणास ही संविधानाची प्रत देतांना आनंद होत आहे. आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ! संविधानाचे जतन करण्यासाठी कायम कटीबद्ध रहाल,असेही या पत्रकात उल्लेख करण्यात आला आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही उपस्थित होते.