हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कृष्णा भागामध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण झाली असून आसना नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीच्या जवळ असणारं कुरुंदा गाव पाण्याखाली गेलं आहे. रात्रभर पडलेल्या पावसाने नदीपात्रातून पाणी थेट गावात शिरले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांच्या संसार उपयोगी साहित्याचे मोठं नुकसान झालं आहे.
दरम्यान, पूरग्रस्त गावांमध्ये प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत पोहोचवण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.