‘अख्खा महाराष्ट्र आता फक्त आदेशाची वाट बघतोय’
‘महाराष्ट्रात एकदा अंगार आणि वणवा पेटला तर विझवताना कठीण जाईल, कारण महाराष्ट्र एक तर पेटत नाही आणि पेटला तर विझत नाही, हा इतिहास आहे. फक्त नाशिकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आदेशाची वाट बघत आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं राजकारण करण्यात आलं आहे, त्यामुळे संपूर्ण देशाच्या लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. पण अख्खा देश आज आपल्या पाठिशी उभा आहे,’ असंही कार्यकर्त्यांना संबोधित करताना संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
sanjay raut vs eknath shinde, ‘उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा महिला रडत होत्या; त्या अश्रूंमध्ये गद्दार वाहून जातील’ – shivsena leader and mp sanjay raut slams eknath shinde and other shivsena rebel mlas in nashik speech
नाशिक : एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असतानाच पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील सभेत बोलताना बंडखोरांवर पुन्हा आक्रमक हल्ला चढवला आहे. ‘शिवसेनेशी बेईमानी करणं सोपं नाही, तुम्हाला ५० खोके पचणार नाहीत. तुम्ही आता शिवसेनेतून गेला आहात ना, मग तिकडे सुखाने राहा आणि आम्ही शिवसेना सोडली हे सांगा. उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला हे बंडखोरांनी सांगून टाकावं. शिवसेनेपासून दूर गेल्यानंतर या आमदारांकडून अनेक कारणं सांगितली जात आहेत. मात्र त्यांनी घेतलेले पैशांचे खोके हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. बंडखोरांच्या या खोकेबाजीला आपण ठोकेबाजीने उत्तर देणार आहोत. उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा महिला रडत होत्या, महिलांच्या त्या अश्रूंमध्ये गद्दार वाहून जातील,’ असा घणाघात राऊत यांनी केला आहे.