नांदेड : नांदेड आणि शेजारच्या हिंगोली जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे असना नदीला पूर आला आहे. मागील २४ तासापासून नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्वच नदी नाल्यांना पूर आला आहे. नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या असना नदीला देखील मोठा पूर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे असना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सकाळ पासून पासदगाव जवळच्या असना नदीवरून पुराचे पाणी जात असल्याने नांदेड ते वसमत हा मार्ग बंद करण्यात आला होता. त्याच बरोबर अर्धापुर तालुक्यातील मेंढला नाल्याला पूर आल्याने या पुराचे पाणी अनेक गावात शिरले आहे.

असना नदी आणि मेंढला नाल्याच्या पुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अस्मानी संकटाचा सामना करावा लागला आहे. नांदेड ते नागपूर महामार्गावर असलेल्या असना नदीच्या पुलापर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे असना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे देखील जिल्ह्याच्या पूर परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

सरकार स्थापनेत कुणाचं योगदान? एकनाथ शिंदेंनी यादी सांगितली; मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल सूचक वक्तव्य
इटनकर यांनी अनेक गावांना देखील भेटी देत तेथील पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे. अर्धापुर तालुक्यातील मेंढला नाल्याला आलेल्या पुरात बामणी या गावात २ जण अडकले होते. गावकरी आणि ‘एनडीआरएफ’ टीमच्या मदतीने या दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस असून पुढील दोन दिवस अजून पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी धोका पत्करून कोणीही नदी, नाले ओलांडून जाऊ नये, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केलं आहे.

मोबाईल नाही हो, चोरट्यांनी चक्क मोबाईलचे ३ टॉवर पळवले; चोरीची पद्धत पाहून पोलीस चक्रावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here