नागपूर : ‘महाविकास आघाडीविरोधातील ऑपरेशनमध्ये सक्रिय असल्याचा दावा करणारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आशिष जयस्वाल घोटाळेबाज आहेत. त्यांना मंत्री करू नये. ईडी-सीबीआयमार्फत त्यांची चौकशी करावी’, अशी मागणी भाजप ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश ठाकरे यांनी पत्रपरिषदेत केली.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदासाठी आशिष जयस्वाल प्रबळ दावेदार मानले जात आहेत. नवीन सरकारचे कामकाज सुरळीत व मंत्री निश्चित होण्यापूर्वीच भाजपच्या एका गटाने अपक्ष आमदाराला लक्ष्य केले. महाविकास आघाडीच्या काळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीनशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप जयस्वाल यांच्यावर केला होता. आरोपाची चौकशी सुरू असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ती बंद केली. धानखरेदीत जयस्वालांनी भ्रष्टाचार केला. रेतीतस्करीतही त्यांचे नाव आहे. मॅक्सवर्थ कंपनीशी हातमिळवणी करून शेतकऱ्यांच्या जमिनी नातेवाईक व निकटवर्तीयांच्या नावे त्यांनी खरेदी केल्या, नातेवाइकांच्या नावे अनेक कंपन्या स्थापन केल्या, असा आरोपही डॉ. ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई; तानाजी सावंतांची जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून हकालपट्टी

भाजपच्या प्रतिमेला तडा जाऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. जयस्वाल यांच्यावरील आरोपांबाबतच पुरावे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठवणार आहोत, असेही डॉ. राजेश ठाकरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here