यानंतर नीता मंडप सोडून निघून गेली. तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही नीता मांडवात परतली नाही. जवळपास ६ तासांहून अधिक वेळ कुटुंबीयांनी नीता यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र लग्न न करण्याच्या निर्णयावर ती ठाम राहिली. त्यामुळे वरात परत गेली.
या प्रकरणी नवरदेवाच्या वडिलांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे. वधूला भेट म्हणून दिलेले लाखो रुपयांचे दागिने तिनं परत केले नसल्याचं वडिलांनी तक्रारीत म्हटलं आहे. वधू आणि तिचं कुटुंब अनेकदा मला भेटलं होतं. मात्र अचानक त्यांचं मनपरिवर्तन कसं झालं त्याची मला कल्पना नाही. झाल्या प्रकारामुळे अतिशय दु:ख झाल्याचं नवरदेवानं सांगितलं.
marriage, हा ‘तो’ नाहीए, मला वेगळा मुलगा दाखवला होता! दोन फेरे होताच नवरी निघून गेली अन् मग… – in etawah bride takes two pheras then calls off wedding ceremony, says groom was too dark
इटावा: लग्न हा आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. हा दिवस अविस्मरणीय व्हावा म्हणून अनेक जण कित्येक दिवस योजना आखत असतात. मात्र उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये एका वधूनं फेरे सुरू असताना लग्न विधी थांबवले. नवरदेव फारच सावळा सावळा असल्याचं म्हणत तिनं लग्नच रद्द केलं. घडलेला पाहून उपस्थित कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना धक्काच बसला.