नंदुरबार : राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं चित्र आहे. यामुळे रस्तेही पाण्याखाली गेले आहे. अशात आता विसरवाडी गावाजवळील पुल पाण्याखाली गेल्याने नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे. महामार्गावर तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या असून पावसामुळे वाहतुकीला मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातकडून येणाऱ्या गाड्या नंदुरबार मार्गे आणि गुजरातकडे जाणाऱ्या गाड्या दहिवत मार्गे वळवण्यात आल्या असून यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे.