सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील चिपी विमानतळाला खराब हवामानाचा वारंवार फटका बसत आहे. गेल्या १५ दिवसात तब्बल ८ वेळा विमानसेवा बंद ठेवण्यात आली. कोकणात पावसाळ्यात हवामान खराब होत असल्याने वारंवार विमानसेवा बंद ठेवण्यात येत आहेत. आजही विमानसेवा बंद असून गेले चार दिवस सलग ही विमानसेवा बंद आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग (चिपी) ते मुंबई आणि मुंबई ते सिंधुदुर्ग (चिपी) विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे प्रवाशी आसन संख्या समाधानकारक असताना केवळ खराब हवामान याचे कारण दाखवून विमान सेवा बंद होत आहे. त्यामुळे मुंबईतुन तळ कोकणात व तळ कोकणातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना नाहक आर्थिक व मानसिक भुर्दंड पडत आहे. चिपी विमानतळ येथील विमानसेवा रद्द झाल्याने गोवा येथून महाग तिकीट खरेदी करून प्रवास करावा लागत आहे. तर काही जण रेल्वेने जाणं पसंद करत आहेत. या दररोजच्या एअर लाईन्सच्या कारणांमुळे विमानाच्या प्रवाशी सेवेवर परिमाण होऊ शकतो त्यामुळे खासदार व केंद्रीय मंत्री यांनी विशेष लक्ष घालावे व गैरसोय व सेवा द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.

जगाने आजवर न पाहिलेला सट्टा: फेक IPLचे आयोजन; क्रिकेटपटू, अंपायर, समालोचक बनावट
या पावसाळी वातावरणात सिंधुदुर्ग विमानतळावरील विमानसेवा अनियमित दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबईकडे विमानाने जाणाऱ्या प्रवाशांमध्ये निराशा आहे. खराब हवामानामुळे चिपी विमानतळावरून गेल्या १५ दिवसात ८ वेळा विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

गुजरातमध्ये अस्मानी संकट! अहमदाबाद पाण्याखाली, ६१ लोकांचा मृत्यू; पाहा पुराचे रौद्ररुप दाखवणारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here