ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. उल्हास नदीसह जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. दुसरीकडे प्रशासनाने धबधबे आणि नद्यांच्या पर्यटन स्थळांवर ३१ ऑगस्टपर्यंत बंदी घातली आहे. तरीही नागरिकांची गर्दी होत आहे. आता कल्याणजवळ मलंगगड नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

मलंगगड परिसरात गेल्या वर्षी पावसाळ्यात नदीत बुडून ६ जणांचा मृत्यू झाला होता. यंदा पावसाळ्याच्या सुरवातीलाच २ तरुणांचा बुडून मृत्यू झालाय. दरम्यान, अंबरनाथ तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांवर तहसीलदारांनी ३१ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू केला आहेत. मनाई असतानाही हा ग्रुप या परिसरात कसा आला? त्यांना पोलिसांनी अडवलं कसं नाही? असा प्रश्न यानंतर उपस्थित करण्यात येत आहे.
चिखलोली धरणावर सुट्टीचा आनंद मिळवण्यासाठी गेला तरुण; पुढे घडले ते धक्कादायक
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network