अमरावती : पाच डोंगरी येथील विहिरीतल्या दूषित पाणी पिल्याने सुमारे २५० पेक्षा अधिक नागरिकांना आजाराची लागण झाली आहे. हेच पाहण्यासाठी केलेल्या नवनीत राणा यांना येथील नागरिकांनी पिण्यासाठी पाणी दिले. मात्र, त्यांनी पाणी नाकारल्याने नागरिकांचा रोष अनावर झाला.

गणेश राठोड हे काटकुंभ या गावातील रहीवासी असून ते सामाजिक कार्यासोबत सक्रिय आहे. पाचडोंगरी या गावामध्ये खा. नवनीत राणा यांनी दौरा केला असता ज्या तलावातील दुषित पाण्याने तीन नागरिकांचा जीव गेला. त्या तलावाला नवनीत राणांनी भेट दिली. यावेळी गणेश राठोड यांनी दुषित तलावातील पाणी नवनीत राणा यांना पिण्यास दिले असता नवनीत राणांनी ते पाणी पिण्यास नकार दिला.

अदानींच्या मुंद्रा बंदराजवळ ३७६ कोटींचं हेरॉइन; ड्रग्ज लपवण्यासाठी असं काही केलं की PHOTO पाहून हादराल

यावेळी नवनीत राणा बोलल्या की तुम्ही हे पाणी पिऊन दाखवा त्यावर उत्तर देत राठोड यांनी सांगितले आजपर्यंत तर हेच पाणी प्यायलं. मात्र, आता तुमच्यासमोरही पिऊन दाखवतो असं बोलून राठोड यांनी त्या ग्लासमधील पाणी सर्वांसमोर प्यायलं.

Maharashtra Monsoon Alert : राज्यात दोन दिवस अस्मानी संकट, मुंबईला ऑरेंज तर ५ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here