खवळलेल्या समुद्रात महिलेच्या डोळ्यांदेखत पतीसह दोन मुलं वाहून गेली; पाहा धडकी भरवणारे दृश्य
महिलेची सर्व वैधकीय पार्श्वभूमी जाणून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. स्त्रीरोग विभागाचे डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी सोमवारी शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातून दीड किलोचा गोळा काढला. शस्त्रक्रियेत गर्भपिशवीही काढावी लागली. दीड तास शस्त्रक्रिया चालली. डॉ. कविता जाधव, भूलतज्ज्ञ डॉ. वैशाली जाधव, परिचारिका धारकर, वानखेडे, कर्मचारी अभिषेक आदींनी शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ यांनी मार्गदर्शन केले.
अनेक महिलांना गाठीचा त्रास जाणवत नाही, एखाद्या वेगळ्याच आजारासाठी तपासणी केली जाते. त्यावेळी गर्भाशयात गाठी असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास येते. गर्भाशयातल्या कोणत्या भागात गाठ यावर उपचार अवलंबून असते. अनेकवेळा गर्भाशयाच्या भिंतीवर गाठी येत असतात. ३० ते ५० वर्ष वयोगटातल्या महिलांमध्ये हे प्रमाण अधिक आहे.
लठ्ठ महिलांच्या शरीरात एस्ट्रोजेन संप्रेरकाचं प्रमाण अधिक असल्याने गाठी होण्याचे प्रमाण व धोका अधिक असतो. ज्या महिलांना कधीच गर्भधारणा झालेली नाही, अशा स्त्रियांमध्येही ही समस्या आढळून येते, असे तज्ज्ञांनी सांगितले.