Mumbai Vegetables Rates : महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. यामुळं राज्यातून मुंबईसह ठाण्यात येणाऱ्या भाजीपाल्यावर परिणाम झाला आहे. परिणामी महागाई वाढण्याची शक्यता आहे.

 

Mumbai Vegetables Rates
भाजीपाल्याचे दर भडकले

हायलाइट्स:

  • अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान
  • भाजीपाला आवक घटली
  • भाजीपाला महागला
मुंबई : राज्यात जून महिन्यात अपेक्षेप्रमाणं मान्सूनचा पाऊस पडला नाही. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे. जून महिन्यात पाऊस न झाल्यानं खरिपाच्या पेरणीवर देखील त्याचा परिणाम झाला आहे. राज्यातील एकूण लागवड योग्य जमीनीपैकी केवळी ६० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. जुलै महिन्यात सुरु झालेल्या अतिवृष्ठीचा भाजीपाला शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अतिवृष्टी आणि रस्त्यांची दुरावस्था झाली असल्यानं मुंबईत येणाऱ्या भाजीपाल्यावर परिणाम झाला आहे. भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यानं भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अतिवृष्टीचा फटका
मुंबईला प्रामुख्यानं नाशिक, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून भाजीपाला पुरवठा केला जातो. मात्र, या भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असल्यानं शेतीचं नुकसान झालं आहे. भाजीपाल्याची आवक देखील घटली आहे.नाशिकहून मुंबईला होणारा भाजीपाला नेहमीच्या प्रमाणात केवळ ३० टक्के होत आहेत. नाशिकमधून मुंबईला येणाऱ्या वाहनांना रस्त्याच्या दुरावस्थेचा सामना करावा लागत आहे, त्यामुळं देखील भाजीपाला पुरठ्यावर परिणाम झाला आहे.
१८ जुलैपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले; कारण काय?
भाजीपाल्याचे दर महागले
अतिवृष्टी झाल्यानं मुंबई आणि ठाण्याला होणाऱ्या भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर महागले होते. गेल्या आठवड्यात मुंबईत भेंडी ६० ते ८० रुपये किलो, गवारी ६० ते ८० रुपये, शिमला मिरची ३० रुपये, दुधी भोपळा २५ ते ३० रुपये, वांगी ४० रुपये तर फ्लॉवर ४० ते ६० रुपये किलो प्रमाणं विक्री केली जात होती. तर, या आठवड्यात भेंडीचा दर प्रतिकिलो १०० ते १२०, गवारीचा दर १०० ते १२०, शिमला मिरची ४० ते ५०, दुधी भोपळा ५० ते ६०, वांगी ६० आणि फ्लॉवर ८० रुपये किलोनं विकला जात आहे.
अफगाणिस्तानातून दुबईमार्गे मुंबईत हेरॉइनची तस्करी; मार्बल भरलेल्या कंटेनरमध्ये कोटींचे हेरॉइन

शेतीला पावसाचा तडाखा
महाराष्ट्रात जून महिन्यात पावसानं मारलेली दांडी आणि जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा शेतीला फटका बसला आहे. जूनमध्ये पाऊस नसल्यानं पेरण्या खोळंबल्या होत्या. आतापर्यंत केवळ ६० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तर, मुंबईसह शहरांना होणाऱ्या भाजीपाला पुरवठा कमी झाला आहे. भाजीपाल्याची आवक घटल्यानं दर महागण्याची शक्यता आहे.
गुरूपौर्णिमेला फडणवीसांची भेट घेणाऱ्या शिवसेना नेत्याला उद्धव ठाकरेंकडून दणका

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : maharashtra mumbai vegetables rates increased due to heavy rainfall in state
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here