हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत २.२७ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्या पाठोपाठ ३४ हजार ७७५ हेक्टरवर तुर, ५९०८ हेक्टरवर मुग तर ४३४० हेक्टरवर उडीदाची पेरणी झाली आहे. त्या पाठोपाठ २९ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. या पिकांमध्ये अद्याप अंतरमशागतच झाली नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाची उघडीपीची प्रतीक्षा लागली आहे.

हिंगोलीत जिल्ह्यात शेतांमध्ये पाणीच पाणी…
क्षणात संपवले तीन वर्षांचे प्रेमसंबंध, मुलाकडचे नाही म्हणाले म्हणून प्रेयसीचं धक्कादायक कृत्य
हिंगोलीत सरासरी ५१६ मि.मी पाऊस
जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत ३९ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत सरासरी ५१६ मिलीमिटर पाऊस झाला असून त्याची टक्केवारी ६० टक्के आहे. पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील ईसापूर, सिद्धेश्वर, येलदरी ही धरणं भरण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर विहीर, तलाव, पाझर तलाव, नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत.
हिंगोलीत पावसाचं रौद्ररूप: जनजीवन विस्कळीत; पुरामुळे अनेक गावाचा संपर्क तुटला