आरोप करायचे आणि निघून जायचं. उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. लोकसभेत मी गटनेता असताना खासदारांवर अन्याय केला असा नवाच आरोप आता त्यांनी केला आहे. मुळात गटनेता काय अन्याय करणार? खासदारांना बोलायला देणं हाच एक अधिकार त्याच्याकडे असतो. लोकसभेत राऊत आणि अरविंद सावंतच बोलायचे हे त्या खासदारांचे आरोप आहेत. त्या खासदारांना बोलायची संधी देण्यासाठी ते जागेवर असायचे का, ते धंदेवाईक राजकारण करण्यासाठी दुनियादारी करत असायचे, अशा शब्दांत राऊत यांनी पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेमंत पाटलांनी काय काय आरोप केले?
विनायक राऊत यांनी पक्ष संघटनेत पदं देताना, निवडणुकीवेळी तिकिटांचं वाटप करताना पैसे उकळले. त्याच्या तक्रारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केल्या होत्या, असे आरोप हेमंत पाटील यांनी केले. ‘मी शिवसेनेत शाखाप्रमुख म्हणून सुरुवात केली. त्यानंतर १२ वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम केलं. जिल्हाप्रमुख कोणत्या परिस्थितीत कामं करतात याची मला कल्पना आहे. राऊतांसारखे लोक जिल्हाप्रमुखांना जाण्यायेण्याची तिकिटं काढायला सांगतात,’ असं पाटील म्हणाले.
आमदार संतोष बांगर जिल्हाप्रमुख होते. तेव्हा विनायक राऊत यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी, जेवणावळीसाठी बांगर यांच्याकडून पैसे घेतले. सोन्याच्या चेन घेतल्या. लोकसभा निवडणुकीवेळी संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून पैसे घेतले गेले, असे धक्कादायक आणि गंभीर आरोप पाटील यांनी केले.