crop insurance scheme | खरीप पिकांचा विमा भरण्यास दहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या काळात बेचिराख गावी विमा पोर्टलला जोडलेली नाहीत तर शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार नाही परिणामी शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान होईल. आमची गावं विमा पोर्टलला जोडावीत, अन्यथा आंदोलनाचा इशारा कळमनुरी तालुक्यातील या शेतकऱ्यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हासोबतच मराठवाड्यातील अनेक गावांचा या यादीत समावेश नसल्याचे बोलले जात आहे.

 

हायलाइट्स:

  • खरीप पिकांचा विमा भरण्यास दहा दिवसांचा कालावधी शिल्लक
  • आमची गावं विमा पोर्टलला जोडावीत
हिंगोली: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सध्या पीक संरक्षण विमा भरण्यासाठी विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अनेक ठिकाणी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. तर काही ठिकाणी सर्व्हर चालत नसल्याने शेतकऱ्यांना सीएससी केंद्र चालकाकडे तासनतास ताटकळत बसावं लागत आहे.यासोबतच मराठवाड्यातील अनेक गावांचा पीक विमा भरण्याचा यादीत समावेत नसल्याने पिक विमा भरण्यापासून वंचित राहावं लागत आहे.

यामध्ये हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील खारबी, देवदरी,रहिमापूर,धुमका,गणगाव, कृष्णापुर,जवळा,धानोरा, चिंचोटी,वसपांगरा या गावांचा समावेश आहे. परिसरात शेतकऱ्यांची शेती आहे. परंतु ही गावी पीक विमा पोर्टलला जोडलेली नसल्यामुळे शेतकरी विम्यापासून वंचित राहत आहेत. दोन ते तीन वर्षांपासून पीक विमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. खरीप पिकांचा विमा भरण्यास दहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या काळात ही गावं विमा पोर्टलला जोडलेली नाहीत तर शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान होईल. आमची गावं विमा पोर्टलला जोडावीत, अन्यथा आंदोलनाचा इशारा कळमनुरी तालुक्यातील या शेतकऱ्यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हासोबतच मराठवाड्यातील अनेक गावांचा या यादीत समावेश नसल्याचे बोलले जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचा पॅटर्नच वेगळा, भर पावसात शेतकऱ्यांच्या बांधावर, बळीराजाला धीर
शंखी गोगलगायीकडून सोयाबीनचा फडशा

उस्मानाबाद जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी सोयाबीन, कापूस, विविध भाजीपाला आणि विविध फळबागेमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सोयाबीन, कापूस यांसारख्या पिकांमध्ये रोप अवस्थेतच गोगलगायीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उस्मानाबाद जिल्हयात अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. जूनमध्ये पावसाने मारलेली दडी आणि जुलै महिन्यात पावसाची संततधार यामुळे वातावरण दमट झालं आहे. यामुळे सखल भागात शंखी गोगलगायीचा पहिल्यांदाच उपद्रव दिसला आहे. काही शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक रात्रीच गोगलगायी फस्त करत असल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. या सर्व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करत आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : farmers in hingoli maharashtra facing problem due to not incoming in crop insurance scheme
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here