नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांत भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. २०२१ मध्ये किती भारतीयांनी नागरिकत्व सोडलं आणि ते अन्य देशात स्थायिक झाले, असा प्रश्न संसदेत विचारण्यात आला. त्यावर सरकारकडून उत्तर देण्यात आलं. सरकारनं दिलेली आकडेवारी पाहून सारेच चकित झाले. २०२१ मध्ये १ लाख ६३ हजार ३७० जणांनी नागरिकत्व सोडल्याची आकडेवारी केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांनी दिली.

२०१९ मध्ये १ लाख ४४ हजार १७ जणांनी भारताचं नागरिकत्व सोडलं होतं. २०२१ मध्ये हा आकडा १९ हजारांनी वाढला. विशेष म्हणजे पाकिस्तानचं नागरिकत्व स्वीकारणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०१९ मध्ये एकाही भारतीयानं मायदेशाचं नागरिकत्व सोडून पाकिस्तानचं नागरिकत्व स्वीकारलं नव्हतं. मात्र २०२१ मध्ये ४१ भारतीय पाकिस्तानात स्थायिक झाले. २०२० मध्ये केवळ ७ भारतीयांनी पाकिस्तानचं नागरिकत्व सोडलं होतं. मात्र २०२१ हाच आकडा जवळपास सहापटीनं वाढला आहे.
६५ वर्षांच्या वृद्धाचा शेजारणीवर २६ वर्षे बलात्कार; आता म्हणतो, तुझ्या सुनेला पाठव
भारतीयांनी मायदेश सोडून पाकिस्तानचं नागरिकत्व स्वीकारण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न सरकारला विचारण्यात आला. त्यावर वैयक्तिक कारणांमुळे या नागरिकांनी मायदेश सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. भारत सोडून अन्य देशांमध्ये स्थलांतरित होणाऱ्यांचं प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढलं आहे. भारत सोडून जाणाऱ्यांची सर्वाधिक पसंती अमेरिकेला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा नंबर लागतो. या यादीत कॅनडा तिसऱ्या, तर ब्रिटन चौथ्या क्रमांकावर आहे.
लोहाराकडून चाकू खरेदी, तीन दिवस रेकी; पत्नी आणि तिच्या प्रियकरावर भरबाजारात सपासप वार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here