China India dispute :चीनकडून भारताविरोधातील कुरापती सुरुच आहेत. भारत आणि चीन यांच्यातील नियंत्रण रेषेजवळ डोकलामजवळ चीननं गाव बसवल्याचे फोटो समोर आले आहेत. चीनकडून नियत्रंण रेषेजवळ महामार्ग उभारला जाणार आहे.

 

India China issue
भारत चीन सीमा प्रश्न प्रातिनिधिक फोटो

हायलाइट्स:

  • चीनच्या कुरापती सुरु
  • डोकलामध्ये गाव बसवलं
  • महामार्गाची निर्मिती करणार
नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनच्या कुरापती सुरुच आहेत. चीन प्रत्यक्ष नियत्रंण रेषेजवळ त्यांची ताकद वाढवण्यासाठी पायाभूत सोयी सुविधांची उभारणी करत आहे. चीननं डोकलाम जवळ गाव उभारल्याचा दावा करण्यात आला आहे. तर, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या उत्तरेकडून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेपर्यंत चीन महामार्ग उभारणार असल्याचं वृत्त हाँगकाँगमधून प्रकाशित होणाऱ्या साऊथ चायना मॉर्निग पोस्ट या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पायाभूत सुविधांची निर्मिती करुन चीनकडून भारताला घेरण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.

डोकलामध्ये चीननं गाव बसवलं

भारतीय सैन्याकडून यापूर्वी चीनकडून तिबेट भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पायाभूत सुविधा उभारल्या जात असल्याचं सागंण्यात आलं होतं. चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागाला जोडण्यासाठी रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीच्या सेवांची निर्मिती करत आहे. २०१७ मध्ये भारतीय सैन्य आणि चीनमध्ये संघर्ष झालेला त्या ठिकाणी चीननं गाव बसवल्याचे सॅटेलाइट फोटो प्रसिद्ध झाले आहेत. सॅटेलाईट फोटोंनुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून ९ किलोमीटर अंतरावर गाव बसवण्यात आलं आहे.
नगरमध्येही तोच पॅटर्न; ठाकरेंच्या पाठिशी राहण्याच्या आणाभाका घेतल्या अन् रातोरात शिंदे गटात गेले

चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळून महामार्गाची निर्मिती
चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळून जाणाऱ्या महामार्गाची निर्मिती देखील करण्यात असल्याचं वृ्त्त साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रानं दिलं आहे. तिबेटपासून ते अरुणाचल प्रदेश जवळ चीनच्या सीमेला जोडणारा महामार्ग उभारण्याचा चीनचा प्रयत्न आहे. चीन त्यांच्या विस्तारवादी धोरणासाठी भारत, नेपाळ आणि तिबेटमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. महामार्ग उभारणी दरम्यान भारत आणि नेपाळच्या ताब्यात असलेल्या भूभागावर महामार्ग उभारण्याचा चीनचा प्रयत्न आहे.
शिवसेना थेट लोकसभा अध्यक्षांनाच अडचणीत आणणार? विनायक राऊतांनी कागदपत्रे दाखवली
दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या १६ फेऱ्या
भारत आणि चीनच्या सैन्य दलांमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भात यापूर्वी १६ वेळा चर्चा झाली आहे. लडाखमधून दोन्ही देशांचं सैन्य हटवण्याबाबत चर्चा करण्यात येत होती. दोन्ही देशांच्या सैन्य दलाच्या वरिष्ठांकडून याबाबत चर्चा करण्यात आली होती. भारतीय सैन्य दलाकडून देपसांग आणि डेमचोक च्या मुद्यावर मार्ग काढण्यात यावा, अशी भूमिका घेण्यात आली आहे. रविवारी यासंदर्भात चर्चा झाली होती.
सोनिया गांधी यांची ईडी चौकशी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचा मोठा निर्णय, काँग्रेस आक्रमक

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : china plan to build new highway near lac with india and built village in doklam
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here