शिवसेनेच्या ४० आमदारांचा पाठिंबा असलेल्या एकनाथ शिंदेंनी पक्षावरच दावा सांगितला आहे. त्यासाठी पक्षात उभी फूट असल्याचं शिंदे यांना सिद्ध करावं लागेल. त्यात त्यांना अपयश आल्यास त्यांच्यापुढे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा पर्याय असेल. शिंदे गट मनसेमध्ये विलीन होईल अशी चर्चा मध्यंतरी सुरू होती. त्यावर राज यांनी भाष्य केलं. शिंदे गटाकडून तसा प्रस्ताव आल्यास नक्की विचार करू, असं ठाकरे म्हणाले.
चाळीस आमदारांचं विलिनीकरण हा तांत्रिक मुद्दा आहे. अनेक वर्तमानपत्रांमध्ये मी हा विषय वाचला. त्या आमदारांकडून विलिनीकरणाचा प्रस्ताव मी नक्कीच विचार करेन, असं राज यांनी म्हटलं. इतके आमदार पक्षात आले तर मनसे कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होईल असं वाटतं का? असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावर माझ्यासाठी आधी मनसैनिक. बाकीचे नंतर, असं उत्तर राज यांनी दिलं.
raj thackeray, एकनाथ शिंदेंचे ४० आमदार मनसेत विलीन झाले तर..? राज ठाकरेंचं ‘मनसे’ उत्तर – i will think over it says mns chief raj thackeray over merger of eknath shinde and his rebel mlas
मुंबई: प्रत्येक पक्षाला वाढण्याचा अधिकार आहे. आपण मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यात गैर काहीच नाही. मात्र तुम्हीच आत्मघातीपणा करायचं ठरवलं तर कोण काय करणार, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेतील फुटीवर भाष्य केलं. तुम्ही सत्तेसाठी काहीही करायचं, कोणासोबतही जायचं आणि पक्ष अडचणीत आल्यावर बाळासाहेबांच्या नावानं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा, असं म्हणत राज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे.