मी मुख्यमंत्री झाल्यावर लोक माझ्या तोंडावर बोलत नव्हते. पण मला कुजबूज ऐकू यायची की, काय हे मुख्यमंत्री आहेत.. नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे असायला हवं. मलईदार खातं आहे म्हणतात. पण मी ते खातं माझ्याकडे न ठेवता विश्वासानं त्यांच्याकडे सोपवलं होतं. मी मलई बिलई खाण्यासाठी गेलो नव्हतो. मी माझ्याकडे जी खाती ठेवली होती ती एक म्हणजे सामान्य प्रशासन, दुसरे न्याय व विधी. आयटीही ठेवलं होतं. कारण खरंच या तंत्रज्ञानाचा उपयोग सगळ्या खात्यांसाठी काहीतरी करता येईल का, हा माझा विचार होता, असं ठाकरेंनी सांगितलं.
uddhav thackeray, राणे, भुजबळांना जी फूट पाडता आली नाही, ती आता कशी काय पडली? उद्धव ठाकरे म्हणतात… – shiv sena chief uddhav thackeray tells why their is big rift in party after eknath shinde becomes rebel
मुंबई: मी शस्त्रक्रियेच्या गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू होता. ज्यांच्यावर विश्वास टाकला, दुसऱ्या क्रमांकाचं पद दिलं, तेच आता शिवसेना गिळायला निघाले आहेत, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. शिवसेना आमचीच याचे पुरावे देण्याची आम्हाला गरज नाही. मतदारच निवडणुकीतून याचं उत्तर देतील. लोक निवडणुकांची वाट पाहत आहेत, असं ठाकरे म्हणाले.