काही दिवसांपूर्वी अमोल मिटकरी बारामती दौऱ्यावर आले होते. यावेळी देखील त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. ते म्हणाले की, दोन मंत्र्यांचं असणारं हे सरकार लवकरच बरखास्त झालेलं दिसेल आणि मध्यावधी निवडणुका लागल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चांगली कामगिरी दिसेल. असा विश्वास त्यांनी यावेळी दर्शवला. ते त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते.
Home Maharashtra maharashtra political crisis, ‘…तर चुल्लूभर पाण्यात जीव द्या’; ‘या’ प्रश्नावरुन अमोल मिटकरी...
maharashtra political crisis, ‘…तर चुल्लूभर पाण्यात जीव द्या’; ‘या’ प्रश्नावरुन अमोल मिटकरी शिंदेंसह फडणवीसांवर भडकले – mla amol mitkari criticized devendra fadnavis and eknath shinde
अकोला : आमदार अमोल मिटकरी आपल्या आक्रमक शैलीमुळे नेहमी चर्चेत असतात. विरोधकांवर आक्रमकपणे टीका करणे यामुळे ते ओळखले जातात. याचदरम्यान, मिटकरींनी अकोला जिल्ह्यातील खिनखेड पूर्णा याठिकाणी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत असताना राज्यात असलेल्या शिंदे सरकारला चांगलेचं धारेवर धरलं असल्याचं पाहायला मिळालं. साडेचारशे हेक्टरच्यावर शेती खरडून गेली आहे. जिल्ह्याला सध्या पालकमंत्री नाहीत, महाराष्ट्राला कृषीमंत्री नाहीत, असं त्यांनी यावेळी सांगितलं.