Jitendra Awhad on Babasaheb Purandare controversy | ब. मो. पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण दिल्यानंतर हे प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आणि ते उपस्थित करणारा महाराष्ट्रातील पहिला राजकीय नेता अथवा इतिहासावर भाष्य करणारा मी होतो. ते प्रश्न विचारल्यानंतर पक्षातून अर्थातच माझ्यावर दबाव सुरु झाला. त्यावेळी माझा राजकीय बळी जाणार, असे मला वाटायला लागले होते.

 

Jitendra Awhad Sharad Pawar
जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार

हायलाइट्स:

  • तू जे काही तुझ्या अभ्यासातून करतो आहेस ते तू कर
  • हा विषय तू गेले अनेक वर्षे हाताळतो आहेस
  • त्यामुळे तुला कोणाचे ऐकण्याची गरज नाही
मुंबई:बाबासाहेब पुरंदरे यांना तत्कालीन राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केल्यानंतर मी त्यांना जाहिररित्या काही प्रश्न विचारले होते. या प्रकरणावरून प्रचंड वाद निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीलच अनेकजण मला माफी घेऊन माघार घ्यायला सांगत होते. माझ्यावर दबाव आणला जात होता. त्यामुळे मी प्रचंड घाबरलो होतो. परंतु, त्या काळातही शरद पवार (Sharad Pawar) यांनी मला कधीच एकटे पडून दिले नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे सातत्याने बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांविषयी लिहलेल्या इतिहासाविषयी प्रश्न उपस्थित करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्याइतका अन्याय कोणीच केला नसेल, असे वक्तव्यही शरद पवार यांनी केले होते. त्यामुळे सध्या राज्यात हा वाद चांगलाच गाजत आहे. (NCP leader Jitendra Awhad on Babasaheb Purandare controversy)
‘छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन गुडगी रोगाने?’ पुरंदरेंच्या लेखनावरुन आव्हाड पुन्हा आक्रमक
या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी एक फेसबुक पोस्ट टाकत या संपूर्ण प्रकरणाची उत्पत्ती कशी झाली, त्याचा प्रवास कसा राहिला आणि सर्वप्रथम आपण याबाबत उपस्थित केलेले मुद्दे कसे बरोबर ठरले, यासंदर्भात भाष्य केले आहे. ब. मो. पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण दिल्यानंतर हे प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आणि ते उपस्थित करणारा महाराष्ट्रातील पहिला राजकीय नेता अथवा इतिहासावर भाष्य करणारा मी होतो. ते प्रश्न विचारल्यानंतर पक्षातून अर्थातच माझ्यावर दबाव सुरु झाला. त्यावेळी माझा राजकीय बळी जाणार, असे मला वाटायला लागले होते. म्हणून तातडीने मी शरद पवार साहेबांना फोन लावला. तसा मी मनातून प्रचंड घाबरलेलो होतो. मी पवार साहेबांना वस्तुस्थिती समजावून सांगितली. तेव्हा शरद पवार यांनी माझे म्हणणे ऐकून घेत तू तुझ्या मार्गाने पुढे जा, असे सांगितले. त्यानंतरी शरद पवार जाहीर पत्रकारपरिषदांमध्ये माझी बाजू घेत होते. जितेंद्र आव्हाड जे बोलतोय ते योग्यच आहे अशी भूमिका ते घेत राहीले, अशी आठवण जितेंद्र आव्हाड यांनी सांगितली.

Jitendra Awhad
Jitendra Awhad

२००४ साली सुरु झालेले हे प्रकरण आजही चालू आहे, आणि यामध्ये कायम मी एकमेव राजकीय नेता होतो त्यावेळेस कि, ज्याने उघडपणाने ब. मो. पुरंदरेंच्या विरोधात भूमिका घेतली. आणि आज मी अत्यंत अभिमानाने सांगतो कि, माझे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी कधीच मला बाजूला केले नाही. कधीच मला एकटे पाडले नाही. किंबहुना पक्षामध्ये अनेक जणांची वेगळी भूमिका असतांना एका छोट्याश्या बहुजन कार्यकर्त्याच्या बाजूने ते उभे राहीले हे मला आज महाराष्ट्राला सांगावेसे वाटते. पक्षातून दबाव असतांना, पक्षातील दुसऱ्या फळीचे अनेक नेते माझ्या मताच्या विरोधात असताना ते कायम माझ्या मागे सावलीसारखे उभे राहिले हे उभ्या महाराष्ट्राला मी स्पष्टपणाने सांगू इच्छितो, असे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : ncp chief sharad pawar always supports me when i spoke about wrongly written history of shivaji maharaj by babasaheb purandare controversy says jitendra awhad
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here