मुंबई: भारतीय क्रिकेट संघानं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला. भारतानं वेस्ट इंडिजचा ११९ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांची मालिका ३-० अशा फरकानं जिंकली. शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली भारतानं विंडीजला व्हाईटवॉश दिला. विशेष म्हणजे धवनला जमलेला पराक्रम आतापर्यंत कोणत्याच भारतीय कर्णधाराला जमलेला नाही.

कपिल देव, सुनील गावस्कर, सौरव गांगुली, विराट कोहली, महेंद्र सिंह धोनी यांच्यासारख्या दिग्गज कर्णधारांना वेस्ट इंडिजला त्यांच्याच मायदेशात व्हाईटवॉश देता आलेला नाही. मात्र दिग्गज कर्णधारांना न जमलेली किमया शिखर धवननं करून दाखवली आहे. त्यामुळे धवनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे अनेक अनुभवी खेळाडू संघात नसतानाही धवनच्या नेतृत्त्वाखाली भारताची कामगिरी उत्तम झाली.
Rishabh Pant: ऋषभ पंतमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला लॉटरीच लागली; तब्बल २००० हजार कोटी मिळणार
टीम इंडियानं सर्वप्रथम १९८३ मध्ये वेस्ट इंडिजचा दौरा केला. त्या मालिकेत भारताला १-२ असा पराभव पत्करावा लागला. यानंतर १९८८ आणि १९९६ मध्ये भारताचा पराभव झाला. टीम इंडियानं २००२ मध्ये विंडीजमध्ये पहिल्यांदा एकदिवसीय मालिका जिंकली. त्यावेळी सौरव गांगुली भारताचा कर्णधार होता. तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारतानं २-१ अशी जिंकली.

आतापर्यंत भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये १० एकदिवसीय मालिका खेळला आहे. त्यातील ४ मालिका विंडीजनं जिंकल्या आहेत. तर ६ मालिकांमध्ये टीम इंडियानं विजय मिळवला आहे. जून २००९ पासून भारतानं वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय मालिका गमावलेली नाही.
श्रीलंकेतील आशिया क्रिकेट चषक आता कोणत्या देशामध्ये खेळवण्यात येणार, जाणून घ्या…
धवनच्या आधी रोहितचा लय भारी विक्रम
भारतानं एकदिवसीय मालिकेत केवळ दोनदाच वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिला आहे. याआधी याच वर्षाच्या फेब्रुवारीत रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतानं वेस्ट इंडिजला ३-० असं नमवलं. एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश देणारा पहिला भारतीय कर्णधार होण्याचा मान त्यामुळे रोहितनं मिळवला. आता धवननं विंडीजला थेट त्यांच्याच मायभूमीत क्लीन स्वीप देण्याची किमया साधली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here