औरंगाबाद : औरंगाबादेतून मुंबई, दिल्लीसाठी सकाळच्या सत्रात विमानसेवेची दीर्घ काळापासून प्रतीक्षा होती. एअर इंडियाने औरंगाबादकरांची ही अडचण दूर केली आहे. येत्या २० ऑगस्टपासून मुंबई व दिल्लीसाठी औरंगाबादहून सकाळची विमानसेवा सुरु होणार आहे. त्यामुळे परदेशात जाणाऱ्या औरंगाबादकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. (morning flights from aurangabad to mumbai and delhi)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमानसेवेंतर्गत मुंबईहून औरंगाबादसाठी सकाळी सात वाजता विमान निघेल. हे विमान औरंगाबादला आठ वाजून दहा मिनिटांनी पोचेल. औरंगाबादहून मुंबईकडे आठ वाजून पन्नास मिनिटांनी परतीच्या प्रवासाला निघेल. तर ते मुंबईला सकाळी दहा वाजता पोहोचेल.

‘दख्खन का ताज’ अशी ओ‌ळख असलेल्या ‘बीबी का मकबऱ्या’च्या जमिनीची मोजणी
तसेच, दिल्लीहून औरंगाबादसाठी पहाटे पाच वाजून २० मिनिटांनी एअर इंडियाचे विमान निघेल. हे विमान सकाळी सव्वासात वाजता औरंगाबादला पोहोचेल. औरंगाबादहून दिल्लीकडे सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी निघेल. निघालेले हे विमान पावणेदहा वाजता दिल्लीत पोहोचेल. औरंगाबादहून दिल्ली व मुंबईसाठी एअर इंडियाची सायंकाळी असलेली विमानसेवा मात्र बंद राहणार आहे.

शिंदे गट-भाजपची पहिली एकत्र निवडणूक, ‘या’ महापालिकेसाठी युती करणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे वेळापत्रक राहणार आहे.

माझी निष्ठा, माझे उद्धवसाहेब! ठाकरेंच्या वाढदिवशी प्रेमाचा सागर, मुस्लिम शिवसैनिकाचे रक्ताने पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here