मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबाबत केलेल्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी त्यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. यावरून शिवसेनाही आक्रमक झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानावर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे आज दुपारी १ वाजता आपल्या निवासस्थान मातोश्रीवर पत्रकार परिषद घेणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. “राज्यपाल महोदयांच्या बेताल विधानाचा समाचार घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आज दुपारी मातोश्री येथे १ वाजता”, असं ट्वीट राऊतांनी केलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेमकं काय म्हणाले?

मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. नोकरी, व्यवसाय तसेच आपलं नाव मोठ करण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि आपली स्वप्न पुर्ण करतात, म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. मात्र, राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी लोकांना सांगतो महाराष्ट्रात मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असं विधान त्यांनी केलं आहे. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र, मुबंईची ती ओळखही उरणार नाहीस असंही कोश्यारी यावेळी म्हणाले.

राज्यपालांच्या वक्तव्याने शिंदे गट आक्रमक, केंद्र सरकारकडे कोश्यारींची तक्रार करणार

राज्यपालांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यासंदर्भात केंद्र सरकारकडे तक्रार करतील, अशी माहिती दीपक केसरकरांनी दिली आहे.

दीपक केसरकर काय म्हणाले?

राज्यपालांचं वक्तव्य हे राज्याचा अपमान करणारे आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांच्याबाबत केंद्र शासनाला लिहिण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. अशी विधाने पुन्हा येऊ नयेत, यासाठी केंद्राला सांगितलं जाऊ शकतं. मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे, अनेक समाजांचं त्यात योगदान आहे. सर्वाधिक वाटा मराठी माणसाचा आहे, ही वस्तुस्थिती आहे. गुजराती-राजस्थानी हे दोनच समाज का, पारसींचं योगदान ही औद्योगिक क्षेत्रात आहे. एखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांच्या योगदानाबद्दल बोलायचं असतं, मात्र त्यांनी पैसा काढून घेतला, तर मुंबईत काही शिल्लक राहणार नाही, हे वक्तव्य मुंबईबाबत अभ्यास नसल्याचं द्योतक आहे, असं दीपक केसरकर ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

राज्यपालांनी मांडलेला ‘सिद्धांत’ ऐकून आश्चर्य वाटलं नाही; रोहित पवार असं का म्हणाले?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here