जिल्ह्यातील तालुक्यातील तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील श्री पुढे सरसावले आहे. तिवरे धरणाच्या दुर्घटनेत अनेकांचा बळी गेला होता तर गावातील अनेक संसार उद्ध्वस्त झाले होते. त्यातून पुनर्वसनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब ध्यानात घेऊन तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी श्री सिद्धिविनायक विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्याकडे ५ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी विश्वस्त संजय सावंत, जी. आर. दळवी, व सुमन घैसास आदी मान्यवर उपस्थित होते.
फुटल्याने हाहाकार माजला होता. २ जुलै २०१९ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर काही क्षणांतच धरणाला भगदाड पडले होते. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या भेंडेवाडी, दादर, आकले, रिकतोली, ओवळी, कळकवणे आणि नांदिवसे या सात गावांत पाणी शिरले होते. या भीषण दुर्घटनेत १९ जण मृत्युमुखी पडले होते तर ४ जणांचा शोध लागू शकला नव्हता. पाण्याच्या प्रचंड लोढ्याने गावांतील अनेक घरे जमीनदोस्त झाली होती. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना सरकारकडून तेव्हा प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने या घटनेची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, ही गावे या दुर्घटनेच्या धक्क्यातून अद्याप पूर्णपणे सावरलेली नाहीत. त्यामुळेच मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या या उद्ध्वस्त कुटुंबांसाठी सिद्धिविनायक विश्वस्त मंडळाने दिलेली मदत मोलाची ठरणार आहे.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines