शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांना भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी धक्का दिला आहे. खोतकर यांनी कालच शिंदे गटात प्रवेश केला. आपल्यावर दबाव आहे. संकटं येतात त्यावेळी माणूस सेफ होण्याचा प्रयत्न करतो, असं सूचक विधान त्यांनी केलं.

पाय ठेऊ देणार नाही- दानवे
जालना लोकसभा मतदारसंघातून नऊवेळा भाजपचा विजय झाला. पाचवेळा रावसाहेब दानवे, प्रत्येकी दोनवेळा उत्तमसिंह पवार आणि पुंडलिकराव दानवे इथून विजयी झालेत. आम्ही ही जमीन वखरली, नांगरली, तिथे पेरणी केली. आता तिथून सगळा माल निघत असताना आम्ही तिथे कोणाला पाय ठेऊ देणार नाही. हा मतदारसंघ भाजपचा आहे. ती रावसाहेब दानवेंच्या बापाची जहागीर नाही. इथे हरिभाऊ उभे राहतील किंवा दुसरं कोणीतरी निवडणूक लढवेल. पण भाजप आपला मतदारसंघ सोडणार नाही. आम्ही ४५ वर्षे हा मतदारसंघ ताब्यात ठेवला नाही. तो दुसऱ्या पक्षाला देण्याचा प्रश्नच येत नाही, अशी स्पष्ट भूमिका दानवेंनी मांडली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.