पाटणा: आगामी काळात देशातील सर्व पक्ष संपतील, फक्त भाजप हाच एकमेव पक्ष शिल्लक राहील. भाजप हा विशिष्ट विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. आपल्या विचारांसमोर सर्व पक्ष नष्ट होतील. जे उरतील तेदेखील संपून जातील, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Nadda) यांनी केले. ते रविवारी बिहारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जे.पी. नड्डा यांच्या हस्ते बिहारमधील भाजपच्या (BJP) १६ जिल्हा कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जे.पी. नड्डा यांनी अत्यंत आक्रमक शैलीत केलेल्या भाषणात देशभरातील प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा इशारा दिला.

आजघडीला भाजपशी लढणारा कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहिलेला नाही. आपली खरी लढाई ही घराणेशाहीविरोधात आहे. भाजप हा एका विचारधारेवर लढणारा पक्ष आहे. हा विचार नसता तर आपण इतकी मोठी लढाई लढू शकलो नसतो, हे मी सगळ्यांना वारंवार सांगत असतो. भाजपसमोर सर्वजण नष्ट झाले आहेत. जे झाले नाहीत तेदेखील संपतील. केवळ भाजप हा एकमेव पक्ष उरेल, असे जे.पी. नड्डा यांनी म्हटले.
राऊतांच्या घरी सापडलेल्या दहा लाखांच्या कॅशवर ‘एकनाथ शिंदें’चं नाव, बंधू सुनील राऊतांचा आरोप
यावेळी जे.पी. नड्डा यांनी काँग्रेस पक्षावरही हल्ला चढवला. लोक काँग्रेसविषयी बोलतात. माझं मतं आहे की, पुढील ४० वर्षे तरी काँग्रेस पक्ष भाजपसमोर उभा राहू शकत नाही. ते आपली बरोबरी करू शकत नाहीत. भाजप ज्याप्रकारचा पक्ष आहे, ते काही दोन दिवसांमध्ये साध्य होत नाही. हे सर्व संस्कारातून येते आणि संस्कार हा पक्षाकडूनच येतो. भाजपची विचारधारा इतकी पक्की आहे की, २० वर्षे दुसऱ्या पक्षांमध्ये राहिलेले लोक आपल्याकडे येत आहेत, असे जे.पी. नड्डा यांनी म्हटले.

संजय राऊतांना ईडीकडून अटक

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडीने अखेर अटक केली. १२०० कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात सतरा तास झाडाझडती केल्यानंतर अंमलबजावणी संचलनालयाने (ED) राऊतांवर कारवाई केली. ईडीनं रविवारी सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या घरी छापा टाकला होता. संजय राऊत यांचा रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदवल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
संजय राऊत यांच्या अटकेनंतर ‘सामना’चा पहिला अग्रलेख; राज्यपालांसह भाजपवर घणाघाती हल्ला
ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

शिवसेनेला आणि महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी करण्यात येत आहेत. हे सगळं दमनचक्र सुरु आहे, असा आरोप केला आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी लढणार, आम्ही लढू, महाराष्ट्र इतका कमजोर नाही, शिवसेना कमजोर नाही, असं संजय राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here