आजघडीला भाजपशी लढणारा कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहिलेला नाही. आपली खरी लढाई ही घराणेशाहीविरोधात आहे. भाजप हा एका विचारधारेवर लढणारा पक्ष आहे. हा विचार नसता तर आपण इतकी मोठी लढाई लढू शकलो नसतो, हे मी सगळ्यांना वारंवार सांगत असतो. भाजपसमोर सर्वजण नष्ट झाले आहेत. जे झाले नाहीत तेदेखील संपतील. केवळ भाजप हा एकमेव पक्ष उरेल, असे जे.पी. नड्डा यांनी म्हटले.
यावेळी जे.पी. नड्डा यांनी काँग्रेस पक्षावरही हल्ला चढवला. लोक काँग्रेसविषयी बोलतात. माझं मतं आहे की, पुढील ४० वर्षे तरी काँग्रेस पक्ष भाजपसमोर उभा राहू शकत नाही. ते आपली बरोबरी करू शकत नाहीत. भाजप ज्याप्रकारचा पक्ष आहे, ते काही दोन दिवसांमध्ये साध्य होत नाही. हे सर्व संस्कारातून येते आणि संस्कार हा पक्षाकडूनच येतो. भाजपची विचारधारा इतकी पक्की आहे की, २० वर्षे दुसऱ्या पक्षांमध्ये राहिलेले लोक आपल्याकडे येत आहेत, असे जे.पी. नड्डा यांनी म्हटले.
संजय राऊतांना ईडीकडून अटक
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडीने अखेर अटक केली. १२०० कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात सतरा तास झाडाझडती केल्यानंतर अंमलबजावणी संचलनालयाने (ED) राऊतांवर कारवाई केली. ईडीनं रविवारी सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या घरी छापा टाकला होता. संजय राऊत यांचा रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदवल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
शिवसेनेला आणि महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी करण्यात येत आहेत. हे सगळं दमनचक्र सुरु आहे, असा आरोप केला आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी लढणार, आम्ही लढू, महाराष्ट्र इतका कमजोर नाही, शिवसेना कमजोर नाही, असं संजय राऊत म्हणाले.