woman gave birth to 5 babies in rajasthan: लग्नानंतर सात वर्षांनी महिला गर्भवती राहिली. कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. घरात बाळाची पावलं पडणार म्हणून कुटुंब उत्साहात होतं. त्यातच महिलेनं एकाचवेळी पाच बाळांना जन्म दिला. कुटुंबाचा आनंद गगनात मावत नव्हता. मात्र त्यांचा आनंद फार दिवस टिकला नाही.

नवजात अर्भकांचं वजन ३०० ते ६६० ग्रॅमच्या दरम्यान होतं. या बालकांना इनक्युबेटरमध्ये ठेवण्यात आलं. त्यांना जयपूरला हलवण्याची तयारी सुरू होती, अशी माहिती डॉ. महेंद्र मीणा यांनी दिली. २५ वर्षांच्या रेशमानं २२ जुलैला ५ बाळांना जन्म दिला. त्यांना वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ केली. मात्र त्यात आम्हाला अपयश आलं, असं मीणा यांना सांगितलं.
लग्नानंतर सात वर्षे रेशमाला मूलबाळ नव्हतं. मूल व्हावं यासाठी रेशमा यांनी बरेच प्रयत्न केले. अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतले. सात वर्षांनी रेशमा गर्भवती राहिल्यानं कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. एकाचवेळी पाच बालकं जन्माला आल्यानं सगळेच आनंदात होते. मात्र पाचही बालकांचा मृत्यू झाल्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.