NCP protest at Raj Bhavan | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे शनिवारी राज्यभरात पडसाद उमटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी संताप व्यक्त केला होता. भाजपच्या नेत्यांनीही राज्यपालांच्या वक्तव्याविषयी असहमती दर्शविली होती. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्टीकरण देत आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हटले होते.

 

Jitendra Awhad NCP

हायलाइट्स:

  • आम्ही शांततेत आंदोलन करणार होतो
  • पोलिसांनी आम्हाला इथेच ताब्यात घेतले
  • हा आंदोलन दडपण्याचा प्रकार आहे
ठाणे:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी ईडीने संजय राऊत यांना अटक केल्याने हा विषय बाजूला पडला होता. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसने याविरोधात सोमवारी थेट राजभवनावर मोर्चा काढला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या नेतृत्त्वाखाली राजभवनावर हा मोर्चा काढण्यात येणार होता. त्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठाण्यातून बसने मुंबईच्या दिशेने निघाले होते. परंतु, पोलिसांनी या बस मध्येच अडवल्या. राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी आणि जितेंद्र आव्हाडांनी यावेळी घोषणबाजी करत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या परिसरात बॅरिकेटिंग करून या सर्वांना रोखून धरले. तेव्हा पोलीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडाफार संघर्ष पाहायला मिळाला.
हे शहाणपणाचं लक्षण नाही, शरद पवार राज्यपाल कोश्यारींवर बरसले
यानंतर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासकट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना थेट उचलून गाडीत टाकले. राष्ट्रवादी काँग्रेसचं हे आंदोलन पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात गुंडाळलं गेलं. या प्रकाराविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही शांततेत आंदोलन करणार होतो, पण पोलिसांनी आम्हाला इथेच ताब्यात घेतले. ही पोलिसांची जबरदस्ती आहे. हा आंदोलन दडपण्याचा प्रकार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांना महाराष्ट्रबद्दल प्रेम नाही. ते मराठी माणसाला भिकारी म्हणतात. हा आमच्या अस्मितेला लागलेला धक्का आहे. राज्यपाल महाराष्ट्रातील जनतेमध्ये दुही निर्माण करण्याचे काम करत आहेत, असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे शनिवारी राज्यभरात पडसाद उमटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी संताप व्यक्त केला होता. भाजपच्या नेत्यांनीही राज्यपालांच्या वक्तव्याविषयी असहमती दर्शविली होती. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्टीकरण देत आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हटले होते.
संजय राऊत यांच्या अटकेनंतर ‘सामना’चा पहिला अग्रलेख; राज्यपालांसह भाजपवर घणाघाती हल्ला
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

“कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही”, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here