मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचलनालयानं अटक केली आहे. ईडीनं काल सकाळी ७ वाजता राऊतांच्या घरावर धाड टाकली. संध्याकाळपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. घराची झाडाझडती घेण्यात आली. ईडीच्या अधिकाऱ्यांना राऊतांच्या घरात ११ लाख ५० हजार रुपयांची रोकड सापडली. त्यानंतर राऊत यांना ताब्यात घेण्यात आलं. रात्री उशिरा त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली.

गेल्याच आठवड्यात ईडीनं पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जींच्या घरांवर छापे टाकले. जवळपास ५० कोटी रुपयांची रोकड ईडीच्या अधिकाऱ्यांची हाती लागली. याशिवाय ५ किलो सोनंदेखील जप्त करण्यात आलं. छापा टाकल्यानंतर अनेकदा ईडीच्या अधिकाऱ्यांना कोट्यवधींची रोकड सापडते. या नोटांचं पुढे काय होतं, असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडला असेल.
संजय राऊत अटकेत; राज ठाकरेंची ‘ती’ दोन भाकितं खरी ठरणार? दुसरं भाकित शरद पवारांबद्दलचं
ईडी, सीबीआय, आयकर विभाग मनी लॉण्ड्रिंग, आयकर अपहार आणि अन्य आर्थिक गुन्ह्यांचा तपास करतात. तपासादरम्यान त्यांना स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार असतो. जप्त करण्यात आलेली रोकड तपास संस्था ताब्यात घेतात. ती न्यायालयासमोर ठेवतात. न्यायालयात सुनावणी होते. न्यायालयानं आदेश दिल्यास रोख रक्कम आरोपीला परत केली जाते. आरोपी दोषी ठरल्यास जप्त संपत्ती सरकारच्या ताब्यात जाते.

तपास संस्थांना छापा टाकण्याचा अधिकार असतो. दोन गोष्टींसाठी छापा टाकण्यात येतो. अटकेसाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी छापे टाकले जातात. ईडी पीएमएलए २००२ च्या अंतर्गत कारवाया करते. छाप्यादरम्यान कादगपत्रं, रोकड अन्य मौल्यवान वस्तू जप्त करण्याचा अधिकार ईडीला आहे. जप्त करण्यात आल्यानंतर पंचनामा केला जातो. तपास अधिकारी पंचनामा तयार करतो. त्याच्यावर दोन स्वतंत्र साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. ज्याची संपत्ती जप्त करण्यात आली आहे, त्याचीही स्वाक्षरी घेतली जाते.
Sanjay Raut: संजय राऊतांच्या अटकेवर शरद पवार मोघम बोलले अन् गाडीत जाऊन बसले
किती रोकड जप्त करण्यात आली आहे, किती बंडलं आहेत, कोणत्या नोटा आहेत, त्या किती आहेत, याची माहिती पंचनाम्यात असते. जप्त नोटांवर चिन्हं असल्यास, त्यावर काही लिहिण्यात आलं असल्यास ईडी त्या नोटा आपल्याकडे जमा करते आणि न्यायालयात पुरावा म्हणून सादर करते. बाकी नोटा बँकांमध्ये जमा करण्यात येतात. जप्त करण्यात आलेला पैसा आरबीआय किंवा एसबीआयमधील केंद्र सरकारच्या खात्यात जमा केला जातो. अनेकदा काही पैसे ठेवण्याची गरज असते. ते पैसे सुनावणी होईपर्यंत तपास संस्था आपल्याकडे ठेवते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here