मुंबई: पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केली आहे. राऊत यांना न्यायालयानं ४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. गोरेगावातील पत्रा चाळीच्या रहिवाशांचं लक्ष या सगळ्या घटनाक्रमाकडे आहे. मात्र त्यांना राजकीय वादात कोणताही रस नाही. पत्रा चाळीच्या ६७२ कुटुंबं राजकीय संघर्षापासून चार हात लांब राहणं पसंत करत आहेत.

पुनर्विकासाचं काम सुरू झालं आहे. आमचं लक्ष आता केवळ अनेक वर्षांपासून थकलेल्या आमच्या घरभाड्याकडे आणि पुनर्विकास झालेल्या घरांकडे लागलं आहे, असं सिद्धार्थ नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष राजेश दळवी यांनी सांगितलं. पत्रा चाळ १० एकरवर पसरलेली आहे.
कोण आहेत राऊतांना गोत्यात आणणाऱ्या स्वप्ना पाटकर? ऑडिओ क्लीप झाली होती व्हायरल
२०१७-१८ मध्ये विकासक एचडीआयएलनं दिवाळखोरी जाहीर केली. तेव्हा इथल्या प्रत्येक घरमालकाला महिन्याला ४० हजार इतकं भाडं मिळत होतं. पत्रा चाळीच्या पुनर्विकासाला २००८ मध्ये सुरुवात झाली. त्यावेळी घरमालकांना महिन्याला १८ हजार रुपये भाडं मिळत होतं. शेवटचा चेक आम्हाला ४० हजारांचा मिळाला होता, असं पत्रा चाळीतील रहिवासी रमाकांत थोरवे यांनी सांगितलं. आम्ही कधीही शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी संपर्क केला नसल्याचं रहिवाशांनी सांगितलं.

चाळीच्या पुनर्विकासाठी त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. गुरुआशिष कन्स्ट्रक्शन, ६७२ घरमालक आणि म्हाडा यांच्यामध्ये करार झाला होता. पत्रा चाळीच्या ६७२ कुटुंबांसाठी गुरुआशिष ६७२ फ्लॅट्स उभारणार, ३ हजार फ्लॅट्स म्हाडाला देणार आणि उरलेल्या जागेचा विकास करून शिल्लक जागा विकणार, अशा आशयाचा करार झाला होता.
…तर तुरुंग कमी पडतील; संजय राऊतांच्या अटकेनंतर शिवसेनेचा भाजप नेतृत्वाला इशारा
गुरुआशिष कन्स्ट्रक्शननं सुरुवातीला बांधकाम हाती घेतलं. त्याचवेळी त्यांनी जमीन आणि एफएसआय दुसऱ्या विकासकाला १ हजार ३४ कोटींना विकल्याचा आरोप आहे. यानंतर गुरुआशिष एचडीआयएलमध्ये विलीन झाली. काही कालावधीनंतर एचडीआयएलनं दिवाळखोरी जाहीर केली. या प्रकरणी शिवसेना नेते रविंद्र वायकर यांनी सर्वप्रथम तक्रार दाखल केली आणि चौकशीची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here