एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुणे येथे झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.

 

uday-samant-2
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुणे येथे झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मंत्रीमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीतही यावर चर्चा झाली असून बंडखोर आमदारांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना याविषयी सूचना दिल्या आहेत.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे सध्या निष्ठा यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. त्यानुसार ते मंगळवारी पुण्यात होते. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक बंडखोर नेतेही मंगळवारी पुण्यात होते. योगायोगाने पुण्याच्या कात्रजमध्ये उदय सामंत आणि आदित्य ठाकरे यांच्या गाड्या समोरासमोर आल्या. यावेळी आदित्य यांच्या सभेहून परत जात असलेल्या शिवसैनिकांनी आक्रमक होत उदय सामंत यांच्याविरोधात ‘गद्दार गद्दार’ अशी घोषणाबाजी केली. यावेळी जमावातून कुणीतरी सामंत यांच्या गाडीच्या काचेवर दगड भिरकवला. त्यात या गाडीची काच फुटली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र तेथे मोठा तणाव निर्माण झाला होता.

बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत यावर चर्चा झाली. सर्व बंडखोर आमदारांची सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने प्राथमिक चर्चा होऊन तसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही गटांचे कार्यकर्ते आक्रमक होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here