पंढरपूर : गावातील क्रिकेट स्पर्धेत खेळताना गुप्तांगाला चेंडू लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विक्रम क्षीरसागर (३५) असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून तरुणाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात विविध ठिकाणी क्रिकेट स्पर्धा होत असतात. मात्र क्रिकेट खेळताना लागणारी संरक्षक साधने, गार्डस या गोष्टी खेळाडूंकडे नसल्याने असे दुर्दैवी प्रकार होत असतात. या पार्श्वभूमीवर तरुणांनी आपला जीव वाचवण्यासाठी क्रिकेट स्पर्धांमध्ये योग्य ती काळजी घेण्याची गरज असल्याचं पंढरपूरमधील घटनेनंतर पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.