करोनाची साथ आल्यापासून पंतप्रधान मोदी ८० कोटी गरिबांना विनामूल्य अन्नधान्य देत असल्याचे अन्य एका भाजप खासदाराने लोकसभेत चर्चेत म्हटले होते. त्या संदर्भात वरुण गांधी यांनी हे विधान केले. निवडणुकीत लाभासाठी फुकट वस्तू वा सेवा देण्याचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांची पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच ‘मुफ्त की रेवडी’ असे म्हणत खिल्ली उडवली होती. त्यानंतर नवीन चर्चेला तोंड फुटले होते.
Home Maharashtra varun gandhi bjp, …मग भ्रष्ट उद्योगपतींनी बुडवलेल्या कर्जाचे काय? वरूण गांधींचा थेट...
varun gandhi bjp, …मग भ्रष्ट उद्योगपतींनी बुडवलेल्या कर्जाचे काय? वरूण गांधींचा थेट पंतप्रधानांना टोला – bjp leader and mp varun gandhi criticized prime minister narendra modi
नवी दिल्ली : मागील पाच वर्षांत भ्रष्ट उद्योगपतींचे १० लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे याकडे लक्ष वेधत, भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मुफ्त की रेवडी’ या टिप्पणीवरून केंद्र सरकारला लक्ष्य केले.