Tejas Thackeray in politics |शिवसेनेला कधी नव्हे तितकी आक्रमक आणि ताज्या दमाच्या नेत्यांची गरज आहे. अशा परिस्थितीत तेजस ठाकरे हे शिवसेनेसाठी हुकमी एक्का ठरू शकतात. तेजस यांच्याभोवती ठाकरे घराण्याचे वलय आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये कार्यकर्त्यांना आकर्षिक करण्याची उपजत क्षमता आहे. आगामी काळात तेजस ठाकरे यांच्याकडे युवासेनेचे प्रमुखपद दिले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा आहे.

हायलाइट्स:
- तरुण आणि प्रतिभावान तेजस ठाकरे यांना वाढिदवसाच्या खूप खूप शुभेच्छा
- मिलिंद नार्वेकर यांनी तेजस यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत
- तेजस यांच्याभोवती ठाकरे घराण्याचे वलय आहे
मिलिंद नार्वेकर यांनी या ट्विटमध्ये तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करणार असल्याचा कोणताही उल्लेख केलेला नाही. मात्र, गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता मिलिंद नार्वेकर यांचे हे ट्विट त्याच्याशी पूर्णपणे फारकत घेणारे. मात्र, आज तेजस ठाकरे स्वत:च राजकीय प्रवेशाबाबत कोणते भाष्य करतात का, हे पाहावे लागेल. काही वर्षांपूर्वी राजकारणात सक्रिय झालेले आदित्य ठाकरे हे एव्हाना चांगलेच स्थिरावले आहेत. ते राज्यभरात शिवसंवाद यात्रा काढून शिंदे गटातील बंडखोरांवर आगपाखड करत आहेत. शिवसेनेला कधी नव्हे तितकी आक्रमक आणि ताज्या दमाच्या नेत्यांची गरज आहे. अशा परिस्थितीत तेजस ठाकरे हे शिवसेनेसाठी हुकमी एक्का ठरू शकतात. तेजस यांच्याभोवती ठाकरे घराण्याचे वलय आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये कार्यकर्त्यांना आकर्षिक करण्याची उपजत क्षमता आहे. आगामी काळात तेजस ठाकरे यांच्याकडे युवासेनेचे प्रमुखपद दिले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा आहे. यासंदर्भात उदधव ठाकरे यांच्याकडून लवकरच महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे.
तेजस ठाकरे आडनावामुळेच मोठे झालेत: निलेश राणे
राज्यात शिवसेनेतील बंडानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मैदानात उतरलेत तर पक्षप्रमुख आता सगळ्यांच्या थेट भेटी घेत आहेत. एकनाथ शिंदे गटाकडूनही ठाकरे यांना रोजच धक्के बसत आहेत. त्यामुळे आता तेजस ठाकरे यांना युवासेनाप्रमुख करुन आदित्य ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याची उद्धव ठाकरे यांनी सुरू केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी ठाकरे घराण्याला यांना लक्ष्य करत, ‘सगळी पद ठाकरेंकडेच ठेवणार, तेव्हा कार्यकर्त्यांनो विचार करा किती साथ द्यायची यांना’, असे वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यापासून तेजस ठाकरेपर्यंत जे काही मिळाले ते केवळ ठाकरे आडनावामुळे बाकी यांचे कर्तृत्व शून्य, अशी टीका निलेश राणे यांनी केली.
तेजस ठाकरे यांना राजकारणातला कुठलाही अनुभव नाही. हा जंगलात फक्त पाल-सरडे शोधत होता. शोधता शोधता तो राजकारणात आलाय. गरजेची पद फक्त ठाकरे कुटुंब घेणार. बाकीच्यांनी फक्त खुर्चा टेबल उचलायचं काम करायचं, असे निलेश राणे यांनी म्हटले. ठाकरेंना बाहेरचा चालत नाही. व्यक्ती कितीही शेंबडा असला तरी आडनाव ठाकरे असेल तरच तो मुख्य पदावर दिसेल, असेही निलेश राणे यांनी म्हटले. त्यामुळे आता शिवसेनेकडून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.