प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून तूफान पाऊस सुरू झाला आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे तर धरण क्षेत्रातील पावसामुळे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या सगळ्यावर प्रशासन लक्ष ठेवून असून परिस्थिती नियंत्रणात आहे. अनेक ठिकाणी अंतर्गत रस्त्यावर पाणी आले आहे.

भंडारपुळे – मालगुंड पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नद्या धोक्याच्या पातळीवर येऊ शकतात. दरम्यान, खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर वाहत आहे. जिल्ह्यात सखल भागात काही ठिकाणी रस्त्यावर पाणी भरले आहे. जिल्ह्यातील एकंदरच या सगळ्या परिस्थितीवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असून अलर्टवर आहे.

एका तरुणीसह ३ तरुण बेपत्ता, सहा दिवसांनी पोलिसांना मिळाली खळबळजनक माहिती

दरम्यान, येत्या ४ तासात हलक्या ते तीव्र स्वरूपाच्या सरी सकाळी १०:३० वाजता जारी करण्यात आला आहे. पुढील ३-४ तासात सातारा जिल्ह्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर घाट परिसरात काही ठिकाणी हलक्या ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आयएमडी मुंबईकडून देण्यात आला आहे.

रत्नागिरी तालुक्यात भंडारपुळे – मालगुंड पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. रत्नागिरीमध्ये शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. तर भंडारपुळे मालगुंड दरम्यान असणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असून वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे असे तहसील विभागाने कळवले.

Kolhapur Rains : कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, राजाराम बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली, वाहतूक बंद
कासे- पुर्ये तर्फे सावर्डे रस्त्यावर कोसळली दरड
संगमेश्वर तालुक्यातील कासे- पुर्ये तर्फे सावर्डे रस्त्यावर दरड कोसळली आहे. त्यामुळे येथील बस वाहतूक थांबली आहे. कोणत्याही प्रकारचे नुकसान नाही असे तालुका प्रशासनाने कळवले आहे.

‘जगबुडी’ इशारा पातळीच्या वर
जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू आहे. खेडजवळ जगबुडी नदी इशारा पातळी वर वाहत आहे.

लेकीच्या शाळेत वेबसाईटवर बाबा महिलेसोबत KISS करताना दिसले, तपास करताच शिक्षकही हादरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here