बर्मिंगहम : राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहाव्या दिवशी अनेक विविध क्रीडा प्रकारांमधील आज अंतिम आणि उपांत्य सामने होते. त्यापैकी एक अॅथलेटिक्समधील १०,००० मीटर रेस वॉकची स्पर्धा होती. या स्पर्धेत भारताच्या संदीप कुमारने कांस्य पदक जिंकले आहे. त्याने ३८:४९:२१ मिनिटात रेस पूर्ण केली. संदीपने ही शर्यत वैयक्तिक सर्वोत्तम वेळासह पूर्ण केली आहे. त्याचबरोबर महिलांच्या भालाफेकीमध्येही भारताच्या अन्नू राणीने कांस्यपदकाची कमाई केली. अन्नूने चौथ्या प्रयत्नामध्ये ६० मीटर भाला फेकला आणि तिने कांस्यपदक आपल्या नावावर केले.

सुवर्णपदक कॅनडाच्या इव्हानला मिळाले आहे. त्याने ३८:३७:३६ मिनिटांमध्ये प्रथम येत शर्यत पूर्ण केली आहे. तर रौप्य पदक हे ऑस्ट्रेलियाच्या डेक्लन टिंगेला मिळाले आहे. त्याने ३८:४२:३३ या वेळेसह शर्यत पूर्ण केली आहे. १० खेळाडूंच्या मैदानी स्पर्धेतील अन्य भारतीय स्पर्धक अंतीम ४३:०४:९७ या वेळेसह स्पर्धेत नवव्या स्थानावर राहिला. न्यूझीलंडच्या क्वेंटीनल ५,००० मीटर नंतर अनेक उल्लंघनांसाठी अपात्र ठरवण्यात आले आणि त्यामुळे नऊचं स्पर्धक शेवटी शिल्लक राहिले.

तिसरे Gold Medal… तिहेरी उडीत भारताने सुवर्ण आणि रौप्यपदकावर नाव कोरत रचला इतिहास…
संदीप पहिल्या १ हजार मीटरमध्ये आघाडीवर होता आणि नंतर तिसर्‍या स्थानावर आला. त्याने त्यानंतर अव्वल स्थान पटकावले आणि अर्धी शर्यत तो तिथेच टिकून राहिला. मात्र, ६,००० मीटरवर तो तिसर्‍या क्रमांकावर आला आणि ९,००० मीटरवर दुसर्‍या स्थानावर पोहोचला आणि शर्यतीच्या अखेरीस त्याने तिसरे स्थान पटकावले.

काल शनिवारी भारताची प्रियंका गोस्वामी राष्ट्रकुल स्पर्धेतील रेसवॉक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तिने १०,००० मीटर स्पर्धेत ४३:३८:८३ या वेळेसह रौप्य पदक जिंकले आहे.

मोठी बातमी! नांदेडमध्ये शिवसेनेला पडणार मोठे खिंडार, जिल्हाप्रमुख मुंढे करणार शिंदे गटात प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here