ind vs aus gold medal final match in cwg : भारताने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडवर दमदार विजय साकारला होता. यापूर्वी भारताने पाकिस्तान आणि बार्बाडोससारख्या संघांना धुळ चारली होती. त्यानंतर इंग्लंडवर मात करत त्यांनी आता अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे आजचा हा अंतिम सामना किती वाजता सुरु होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती.

भारताची राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरी…
भारताने उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान इंग्लंडवर दमदार विजय साकारला आणि त्यांनी अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडपुढे १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला १६० धावा करता आल्या आणि भारताने चार धावांनी विजय साकारला. स्मृतीने या सामन्यात ३२ चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६१ धावांची धमाकेदार खेळी साकारली आणि भारताला दमदार सुरुवात करून दिली. स्मृतीच्या या भन्नाट खेळीमुळेच भारताला १०च्या सरासरीने सुरुवात करता आली होती. भारताच्या १६५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात आश्वासक झाली नाही. भारताच्या स्नेह राणाने यावेळी दोन तर दीप्ती शर्माने एक विकेट मिळवली. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताने यावेळी तीन विकेट्स या धावचीत करत मिळवल्या. त्यामुळे भारताने या सामन्यात फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीच नाही तर क्षेत्ररक्षणही उत्तम केल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी भारताने पाकिस्तान आणि बार्बाडोस यांच्यावर दणदणीत विजय साकारला होता. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या साखळी आणि अंतिम सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.