Abdul Sattar TET exam Scam | आता अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुली हिना आणि उजमा यांची नावे असल्याचे समोर आले आहेत. या दोघींचीही प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचेही समजते. हिना आणि उजमा या दोन्ही शिक्षिका अब्दुल सत्तार यांच्या मुली असून २०२० मध्ये त्या अपात्र ठरल्या आहेत. सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये या दोन्ही मुलींचा समावेश आहे.

 

Prithviraj Chavan Abdul Sattar
पृथ्वीराज चव्हाण आणि अब्दुल सत्तार

हायलाइट्स:

  • संभाव्य मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत
  • पृथ्वीराज चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांना टोला हाणला
  • अब्दुल सत्तार यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत
मुंबई: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणाचे धागेदोरे एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर राजकारणाला सुरुवात झाली आहे. अब्दुल सत्तार हे शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याची चर्चा आहे. यासाठी अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या सिल्लोड मतदारसंघात नुकतेच जोरदार शक्तीप्रदर्शनही केले होते. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. हाच धागा पकडत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांना टोला हाणला आहे. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना टीईटी घोटाळ्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, अब्दुल सत्तारांनाच आता हे शिक्षणमंत्री करतील. त्यामुळे आता टीईटी घोटाळ्यातून राजकीय कलगीतुरा आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्या मुलींनी टीईटी परीक्षा दिली. पण त्या पात्र झाल्या नाहीत. आज अचानक २०२२ मध्ये यादी समोर आली. या चार वर्षांमध्ये कुठेही मुली पास झाल्या असतील आणि त्याचा फायदा घेतला असेल ते दाखवा. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमची चूक असेल तर माझ्या मुलींवर कारवाई करावी. पण चूक नसेल तर ज्यांनी हे सर्व आरोप केले आहेत, त्याला फासावर लटकवायला पाहिजे, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले.
अब्दुल सत्तार संतप्त; म्हणाले, … तर ज्यांनी हे आरोप केलेत त्यांना फासावर लटकवा!
…तर घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागतील: पृथ्वीराज चव्हाण

देशात आणि राज्यात लोकशाही शिल्लक राहिली आहे की नाही, याबाबत आम्हाला शंक आहे. बेकायदेशीतपणे निर्णय घेतले जात आहेत. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरु आहे. त्यामुळे घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागतील, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

Bihar Politics: बिहारमधील ‘एकनाथ शिंदे’ कोण? नितीशकुमारांना जेडीयूमधील बंडाची चाहुल कधी लागली?
काय आहे टीईटी घोटाळा प्रकरण?

पुणे सायबर सेल पोलिसांनी टीईटी परीक्षेचा गैरव्यवहार उघडकीस आणला होता. या प्रकरणात तपास करत असताना २०१९-२० च्या टीईटी परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ परीक्षार्थ्यांना पात्र केल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील सात हजार ८०० परीक्षार्थी अपात्र असतानाही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०१९-२० मध्ये पैसे देऊन पात्र ठरलेल्या सात हजार ८०० उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पोलिस व शिक्षण विभागाकडून पडताळणी करण्यात आली होती.

त्यामध्ये उमेदवारांच्या ओएमआर शीटमध्ये फेरफार, गुण वाढवून देणे आणि थेट प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले होते. पात्र नसताना पैसे घेऊन पात्र असल्याचे प्रमाणपत्र मिळविलेल्या सात हजार ८०० जणांची यादी पुणे सायबर पोलिसांनी शिक्षण विभागाला दिली होती.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here